शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागणार होता; पण एका कारणामुळे विचार बदलला, अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 16:19 IST

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल क्षेपणास्त्र डागणार होता

नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतीय क्षेपणास्त्र तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानात कोसळलं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे पाकिस्ताननं संताप व्यक्त केला आहे. पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्राकडे याबद्दल तक्रार केली आहे. क्षेपणास्त्र प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे. 

भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या भूमीवर कोसळल्यानंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान तितक्याच क्षमतेचं क्षेपणास्त्र डागणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली. त्यामुळे क्षेपणास्त्र डागण्याचा निर्णय पाकिस्तानकडून रद्द करण्यात आला.

भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागलं जाणार होतं. प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान ही कारवाई करणार होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्याचे संकेत तपासातून मिळाले. त्यानंतर पाकिस्ताननं आपला निर्णय बदलला आणि पुढील अनर्थ टळला. ब्लूमबर्गनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 

भारताचं एक क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात कोसळलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही रहिवासी इमारतींचं नुकसान झालं. भारतानं या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. नियमित देखभाल केली जात असताना चुकून क्षेपणास्त्र डागलं गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं. या घटनेच्या चौकशीसाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान