शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भारताशी उत्तम संबंध ठेवण्याची पाकिस्तानला इच्छा - पंतप्रधान शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:51 IST

शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानचे संबंध उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असेही शरीफ म्हणाले. शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे. नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, भारताला पाकिस्तानशी विधायक संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया रोखण्याची गरज आहे. दहशतवादापासून आपला परिसर मुक्त असावा. तिथे शांतता व स्थैर्य नांदावे,  अशी भारताची इच्छा आहे. विकास साधण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती.शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे हे सारेजण जाणतात. दोन्ही देशांच्या जनतेची सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करूया, असेही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

सर्जिकल स्ट्राईकनंतर तणाव वाढलापुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत फेब्रुवारी २०१९मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांत आणखी तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताने ऑगस्ट २०१९मध्ये रद्द केला. त्या निर्णयाचा पाकिस्तानने निषेध केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत