शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारताशी उत्तम संबंध ठेवण्याची पाकिस्तानला इच्छा - पंतप्रधान शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:51 IST

शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे.

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानचे संबंध उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर तोडगा काढणे आवश्यक आहे, असेही शरीफ म्हणाले. शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले होते. त्याला शरीफ यांनी उत्तरादाखल पत्र पाठविले आहे. नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, भारताला पाकिस्तानशी विधायक संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया रोखण्याची गरज आहे. दहशतवादापासून आपला परिसर मुक्त असावा. तिथे शांतता व स्थैर्य नांदावे,  अशी भारताची इच्छा आहे. विकास साधण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली होती.शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे हे सारेजण जाणतात. दोन्ही देशांच्या जनतेची सामाजिक-आर्थिक प्रगती साधण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करूया, असेही त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

सर्जिकल स्ट्राईकनंतर तणाव वाढलापुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत फेब्रुवारी २०१९मध्ये सर्जिकल स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांत आणखी तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा भारताने ऑगस्ट २०१९मध्ये रद्द केला. त्या निर्णयाचा पाकिस्तानने निषेध केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत