शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:38 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता पाकिस्तानी मिसाईल वैज्ञानिक भारतीय मिसाईलची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मुनीर यांच्या लष्कराने नुकताच दावा केला होता की त्यांनी भारताच्या अग्नि-५ सारखी मिसाईल तयार केली आहे. पण गंमत म्हणजे, या मिसाईलची चाचणी घेताच ती हवेत उडण्याऐवजी थेट जमिनीवर कोसळली.

असा प्रकार पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. पाकिस्तानच्या मिसाईल वारंवार पाकिस्तानमध्येच धडाम होत आहेत. एकट्या जुलै महिन्यातच पाकिस्तानमध्ये २ मिसाईल अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची शाहीन-३ मिसाईल चाचणीदरम्यान बलुचिस्तानमधील अणुप्रकल्पाच्या अगदी जवळ कोसळली होती आणि आता पाकिस्तानच्या अबाबील मिसाईलची चाचणीही धोकादायक पद्धतीने अपयशी ठरली आहे.

भारताची नक्कल का नाही जमणार?

जेव्हा भारत ब्रह्मोस डागतो, तेव्हा शत्रूच्या गोटात काय होते... याचं उत्तर ऑपरेशन सिंदूरदरम्यान आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ या दोघांनाही चांगल्याप्रकारे मिळालं आहे. पण जेव्हा पाकिस्तान मिसाईल डागतो, तेव्हा काय होतं? याचं उत्तर पाकिस्तान स्वतःच वारंवार देत असतो. त्यांच्या मिसाईल चाचणीदरम्यानच फुस होत आहेत.

अबाबील मिसाईलची १३वी चाचणी फेल!

पाकिस्तानच्या मिसाईलमध्ये किती ताकद आहे, त्या काय करू शकतात. याचं उत्तर पाकिस्तानच्या अबाबील चाचणीच्या व्हिडिओमधून मिळालं आहे, ज्यात ही मिसाईल फेल होताना दिसत आहे. ना शहबाजचे वैज्ञानिक काही करू शकले, ना असीम मुनीरचं पाकिस्तानी सैन्य. ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या हवेतील दाव्यांची पोलखोल झाली, त्याचप्रकारे आता पाकिस्तानच्या खोट्या अणुबॉम्बच्या ताकदीची हवा निघाली आहे. कारण अणुबॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या पाकिस्तानच्या प्रत्येक मिसाईल पाकिस्तानसाठीच धोका बनून जमिनीवर कोसळत आहे. पाकिस्तानची अबाबील मिसाईल ही अग्नि-५ मिसाईलची कॉपी-पेस्ट व्हर्जन होती.

भारताच्या मिसाईलची नक्कल करण्याची वेळ का आली?

पाकिस्तानने भारताला लक्ष्य करून चीनकडून खरेदी केलेल्या पीएल १५ मिसाईल डागल्या होत्या. चीनच्या एचक्यु ८ एअर डिफेन्स सिस्टिममधून मिसाईल डागण्यात आल्या, तसेच फतह आणि बाबर सारख्या मिसाईलचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या लष्कराने आपली संपूर्ण मिसाईल ताकद पणाला लावली होती, पण मुनीर सैन्याच्या शस्त्रागारामध्ये ठेवलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या मिसाईलचा स्ट्राइक रेट शून्य असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानच्या मिसाईल एकतर त्यांच्याच सीमेत कोसळल्या किंवा भारताच्या थोड्याच आत येऊन पडल्या. बाकीच्यांना भारताच्या एस-४००ने ढिगारा बनवून टाकले. आपल्या मिसाईल निकामी होताना पाहून, आता पाकिस्तान भारताच्या मिसाईलची नक्कल करत आहे. अबाबील मिसाईलही याच दिशेने एक पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत