शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:38 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता पाकिस्तानी मिसाईल वैज्ञानिक भारतीय मिसाईलची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मुनीर यांच्या लष्कराने नुकताच दावा केला होता की त्यांनी भारताच्या अग्नि-५ सारखी मिसाईल तयार केली आहे. पण गंमत म्हणजे, या मिसाईलची चाचणी घेताच ती हवेत उडण्याऐवजी थेट जमिनीवर कोसळली.

असा प्रकार पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. पाकिस्तानच्या मिसाईल वारंवार पाकिस्तानमध्येच धडाम होत आहेत. एकट्या जुलै महिन्यातच पाकिस्तानमध्ये २ मिसाईल अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची शाहीन-३ मिसाईल चाचणीदरम्यान बलुचिस्तानमधील अणुप्रकल्पाच्या अगदी जवळ कोसळली होती आणि आता पाकिस्तानच्या अबाबील मिसाईलची चाचणीही धोकादायक पद्धतीने अपयशी ठरली आहे.

भारताची नक्कल का नाही जमणार?

जेव्हा भारत ब्रह्मोस डागतो, तेव्हा शत्रूच्या गोटात काय होते... याचं उत्तर ऑपरेशन सिंदूरदरम्यान आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ या दोघांनाही चांगल्याप्रकारे मिळालं आहे. पण जेव्हा पाकिस्तान मिसाईल डागतो, तेव्हा काय होतं? याचं उत्तर पाकिस्तान स्वतःच वारंवार देत असतो. त्यांच्या मिसाईल चाचणीदरम्यानच फुस होत आहेत.

अबाबील मिसाईलची १३वी चाचणी फेल!

पाकिस्तानच्या मिसाईलमध्ये किती ताकद आहे, त्या काय करू शकतात. याचं उत्तर पाकिस्तानच्या अबाबील चाचणीच्या व्हिडिओमधून मिळालं आहे, ज्यात ही मिसाईल फेल होताना दिसत आहे. ना शहबाजचे वैज्ञानिक काही करू शकले, ना असीम मुनीरचं पाकिस्तानी सैन्य. ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या हवेतील दाव्यांची पोलखोल झाली, त्याचप्रकारे आता पाकिस्तानच्या खोट्या अणुबॉम्बच्या ताकदीची हवा निघाली आहे. कारण अणुबॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या पाकिस्तानच्या प्रत्येक मिसाईल पाकिस्तानसाठीच धोका बनून जमिनीवर कोसळत आहे. पाकिस्तानची अबाबील मिसाईल ही अग्नि-५ मिसाईलची कॉपी-पेस्ट व्हर्जन होती.

भारताच्या मिसाईलची नक्कल करण्याची वेळ का आली?

पाकिस्तानने भारताला लक्ष्य करून चीनकडून खरेदी केलेल्या पीएल १५ मिसाईल डागल्या होत्या. चीनच्या एचक्यु ८ एअर डिफेन्स सिस्टिममधून मिसाईल डागण्यात आल्या, तसेच फतह आणि बाबर सारख्या मिसाईलचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या लष्कराने आपली संपूर्ण मिसाईल ताकद पणाला लावली होती, पण मुनीर सैन्याच्या शस्त्रागारामध्ये ठेवलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या मिसाईलचा स्ट्राइक रेट शून्य असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानच्या मिसाईल एकतर त्यांच्याच सीमेत कोसळल्या किंवा भारताच्या थोड्याच आत येऊन पडल्या. बाकीच्यांना भारताच्या एस-४००ने ढिगारा बनवून टाकले. आपल्या मिसाईल निकामी होताना पाहून, आता पाकिस्तान भारताच्या मिसाईलची नक्कल करत आहे. अबाबील मिसाईलही याच दिशेने एक पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत