शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:38 IST

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता पाकिस्तानी मिसाईल वैज्ञानिक भारतीय मिसाईलची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मुनीर यांच्या लष्कराने नुकताच दावा केला होता की त्यांनी भारताच्या अग्नि-५ सारखी मिसाईल तयार केली आहे. पण गंमत म्हणजे, या मिसाईलची चाचणी घेताच ती हवेत उडण्याऐवजी थेट जमिनीवर कोसळली.

असा प्रकार पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. पाकिस्तानच्या मिसाईल वारंवार पाकिस्तानमध्येच धडाम होत आहेत. एकट्या जुलै महिन्यातच पाकिस्तानमध्ये २ मिसाईल अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची शाहीन-३ मिसाईल चाचणीदरम्यान बलुचिस्तानमधील अणुप्रकल्पाच्या अगदी जवळ कोसळली होती आणि आता पाकिस्तानच्या अबाबील मिसाईलची चाचणीही धोकादायक पद्धतीने अपयशी ठरली आहे.

भारताची नक्कल का नाही जमणार?

जेव्हा भारत ब्रह्मोस डागतो, तेव्हा शत्रूच्या गोटात काय होते... याचं उत्तर ऑपरेशन सिंदूरदरम्यान आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ या दोघांनाही चांगल्याप्रकारे मिळालं आहे. पण जेव्हा पाकिस्तान मिसाईल डागतो, तेव्हा काय होतं? याचं उत्तर पाकिस्तान स्वतःच वारंवार देत असतो. त्यांच्या मिसाईल चाचणीदरम्यानच फुस होत आहेत.

अबाबील मिसाईलची १३वी चाचणी फेल!

पाकिस्तानच्या मिसाईलमध्ये किती ताकद आहे, त्या काय करू शकतात. याचं उत्तर पाकिस्तानच्या अबाबील चाचणीच्या व्हिडिओमधून मिळालं आहे, ज्यात ही मिसाईल फेल होताना दिसत आहे. ना शहबाजचे वैज्ञानिक काही करू शकले, ना असीम मुनीरचं पाकिस्तानी सैन्य. ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या हवेतील दाव्यांची पोलखोल झाली, त्याचप्रकारे आता पाकिस्तानच्या खोट्या अणुबॉम्बच्या ताकदीची हवा निघाली आहे. कारण अणुबॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या पाकिस्तानच्या प्रत्येक मिसाईल पाकिस्तानसाठीच धोका बनून जमिनीवर कोसळत आहे. पाकिस्तानची अबाबील मिसाईल ही अग्नि-५ मिसाईलची कॉपी-पेस्ट व्हर्जन होती.

भारताच्या मिसाईलची नक्कल करण्याची वेळ का आली?

पाकिस्तानने भारताला लक्ष्य करून चीनकडून खरेदी केलेल्या पीएल १५ मिसाईल डागल्या होत्या. चीनच्या एचक्यु ८ एअर डिफेन्स सिस्टिममधून मिसाईल डागण्यात आल्या, तसेच फतह आणि बाबर सारख्या मिसाईलचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या लष्कराने आपली संपूर्ण मिसाईल ताकद पणाला लावली होती, पण मुनीर सैन्याच्या शस्त्रागारामध्ये ठेवलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या मिसाईलचा स्ट्राइक रेट शून्य असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानच्या मिसाईल एकतर त्यांच्याच सीमेत कोसळल्या किंवा भारताच्या थोड्याच आत येऊन पडल्या. बाकीच्यांना भारताच्या एस-४००ने ढिगारा बनवून टाकले. आपल्या मिसाईल निकामी होताना पाहून, आता पाकिस्तान भारताच्या मिसाईलची नक्कल करत आहे. अबाबील मिसाईलही याच दिशेने एक पाऊल मानले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत