शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:58 IST

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारी देश पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या भीषण पुराशी झुंज देत आहे. कोट्यवधी लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महागाई गगनाला भिडत आहे. दरम्यान, लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हे पाहता पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करणार आहे.

पाकिस्तान पुन्हा भारतोसोबत व्यापार सुरू करणार असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी सोमवारी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्या हवाल्याने दिले. पाकिस्तान भारतासोबत व्यापार (खुला व्यापार मार्ग) पुन्हा सुरू करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी ही केली, "या पूर आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरू करू,” असे ते म्हणाले.

"रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे ५०० आणि ४०० रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या,” अशी माहिती लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

भारताची भूमिका काय?अटारी-वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो, कांद्याचा पुरवठा केला जात आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा म्हणाले की, पुरामुळे बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. “सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. इराणमधून ताफतान सीमेवरून (बलुचिस्तान) भाजीपाला आयात करणे तितके सोपे नाही.0 इराण सरकारने आयात आणि निर्यातीवर कर वाढवला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत