शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:58 IST

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारी देश पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या भीषण पुराशी झुंज देत आहे. कोट्यवधी लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महागाई गगनाला भिडत आहे. दरम्यान, लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हे पाहता पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करणार आहे.

पाकिस्तान पुन्हा भारतोसोबत व्यापार सुरू करणार असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी सोमवारी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्या हवाल्याने दिले. पाकिस्तान भारतासोबत व्यापार (खुला व्यापार मार्ग) पुन्हा सुरू करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी ही केली, "या पूर आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरू करू,” असे ते म्हणाले.

"रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे ५०० आणि ४०० रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या,” अशी माहिती लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

भारताची भूमिका काय?अटारी-वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो, कांद्याचा पुरवठा केला जात आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा म्हणाले की, पुरामुळे बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. “सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. इराणमधून ताफतान सीमेवरून (बलुचिस्तान) भाजीपाला आयात करणे तितके सोपे नाही.0 इराण सरकारने आयात आणि निर्यातीवर कर वाढवला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत