शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

पाकिस्तानने भारताला दिली धमकी! गंभीर परिणाम भोगावे लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:26 IST

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला.

ठळक मुद्देमर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार  मोडून टाकले आहे.पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजिबात कमी झालेली नाही. 

वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला. मर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार  मोडून टाकले आहे. पाकिस्तानला अनेकदा हॉटलाईनवरुन चर्चा करुन गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. इतके सर्व झाल्यानंतरही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजिबात कमी झालेली नाही. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईककरुन आमच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केले तर, भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे काही घडल्यास कोणीही पाकिस्तानकडून आत्मसंयम ठेवण्याची अपेक्षा बाळगू नये अशी मुक्ताफळे असिफ यांनी उधळली आहेत. ख्वाजा असिफ सध्या अमेरिका दौ-यावर आहेत. तिथून बोलताना त्यांनी भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. 

केंद्र सरकारने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला तर, पाकिस्तानात घुसून त्यांचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असे हवाई दल प्रमुख धानोआ यांनी सांगितले होते.  पाकिस्तानातील अणवस्त्राचे तळ शोधून तिथे हल्ला करु शकते असे धानोआ म्हणाले होते. पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला होता. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये असताना भारताविरोधात अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली होती. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले होते. 

दोन्ही आघाडयांवर लढण्यास सक्षमभारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे असे बी.एस.धानोआ यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान