शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने भारताला दिली धमकी! गंभीर परिणाम भोगावे लागतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:26 IST

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला.

ठळक मुद्देमर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार  मोडून टाकले आहे.पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजिबात कमी झालेली नाही. 

वॉशिंग्टन - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला. मर्यादीत स्वरुपाच्या या लढाईमध्ये भारताने पाकिस्तानचे कंबरडे पार  मोडून टाकले आहे. पाकिस्तानला अनेकदा हॉटलाईनवरुन चर्चा करुन गोळीबार थांबवण्याची विनंती करावी लागली. इतके सर्व झाल्यानंतरही पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी अजिबात कमी झालेली नाही. 

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईककरुन आमच्या अणवस्त्र तळांना लक्ष्य केले तर, भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असे काही घडल्यास कोणीही पाकिस्तानकडून आत्मसंयम ठेवण्याची अपेक्षा बाळगू नये अशी मुक्ताफळे असिफ यांनी उधळली आहेत. ख्वाजा असिफ सध्या अमेरिका दौ-यावर आहेत. तिथून बोलताना त्यांनी भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. 

केंद्र सरकारने आणखी एका सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला तर, पाकिस्तानात घुसून त्यांचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असे हवाई दल प्रमुख धानोआ यांनी सांगितले होते.  पाकिस्तानातील अणवस्त्राचे तळ शोधून तिथे हल्ला करु शकते असे धानोआ म्हणाले होते. पाकिस्तान वारंवार त्यांच्याकडे असलेल्या अणवस्त्रांची धमकी भारताला देत असतो. त्या पार्श्वभूमीवर बी.एस.धानोआ यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला होता. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी अमेरिकेमध्ये असताना भारताविरोधात अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली होती. भारताच्या 'कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रीन' रणनितीचा सामना करण्यासाठी आम्ही छोटया पल्ल्याची अण्वस्त्रे विकसित केली आहेत असे त्यांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या न्यूक्लियर कमांड ऑथोरीटीकडे पाकिस्तानच्या अणवस्त्र साठयाचे नियंत्रण असून, प्रसंगी वापर करण्याचे अधिकारही एनसीएकडे असल्याचे अब्बासी यांनी सांगितले होते. 

दोन्ही आघाडयांवर लढण्यास सक्षमभारतीय हवाई दल चीनचा मुकाबला करण्यासाठी सक्षम असून, एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवरील लढाईसाठी पूर्णपणे सज्ज आहे असे बी.एस.धानोआ यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईकसारख्या ऑपरेशनमध्ये हवाई दलाला सहभागी करुन घ्यायचे कि, नाही तो निर्णय सर्वस्वी सरकारचा आहे असे ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान