शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारतासोबत चर्चेस तयार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 16:10 IST

भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने या प्रश्नावरून जागतिक पातळीवर रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. पण...

इस्लामाबाद - भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानने या प्रश्नावरून जागतिक पातळीवर रान पेटवण्याचा प्रयत्न केला होता. भारताला युद्धाचीही धमकी दिली होती. मात्र हे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता पाकिस्तान काश्मीर प्रश्न पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला भारतोसोबत चर्चा करण्यात काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र पाकिस्तान आणि भारत यांच्यातील काश्मीरबाबतच्या द्विपक्षीय चर्चेत काश्मीर हा तिसरा पक्ष आहे. त्यामुळे काश्मिरी नेत्यांची भेट घेण्याची परवानगी मिळावी, अशी अट त्यांनी घातली आहे. शाह मोहम्मद कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानने चर्चेसाठी कधीही नकार दिलेला नाही. तसेच द्विपक्षीय चर्चेत कुणी तिसरा पक्ष मध्यस्थी करणार असेल तर त्याचेही आम्ही स्वागतच करू. मात्र भारताच्या बाजूने चर्चेसाठी अनुकूल वातावरण दिसत नाही. तसेच काश्मीरप्रश्नी तीन पक्ष आहेत. भारत-पाकिस्तान आणि काश्मीर. त्यामुळे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नजरकैदेत असलेल्या काश्मिरी नेत्यांना मुक्त करावे.'' 

तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेसाठी पाकिस्तानने एक अटही घातली आहे. आम्हाला काश्मिरी नेत्यांना भेटण्याची परवानगी मिळाली पाहिजे. जेणेकरून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना चर्चेसाठी तयार करता येईल, असा दावा कुरेशी यांनी केला आहे. दरम्यान, भारताने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता भारतासोबत कुठलीही चर्चा करणार नसल्याची धमकी दिली होती. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान