पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर भारताने या तणावाची माहिती देण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ विदेशात पाठवले. असेच एक शिष्टमंडळ पाकिस्ताननेही विदेशात पाठवले.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता उघडपणे अमेरिकेकडे प्रगत शस्त्रास्त्र प्रणालींसाठी विनंती करत आहे. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य आणि नवाझ शरीफ मंत्रिमंडळातील मंत्री मुसादिक मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते अमेरिकेला हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमाने विकण्याची विनंती करत आहेत.
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
व्हायरल व्हिडिओमध्ये मलिक बोलत आहेत की, "भारत ८० विमाने आणि ४०० क्षेपणास्त्रांसह आला होता. यात ते क्षेपणास्त्र वाहने वाहून नेण्यास सक्षम आहेत. तुम्ही पाहिलं आहे आमच्यासोबत काय झालं असतं. आमच्याकडे जर एअर डिफेन्स सिस्टम नसती तर आम्ही आमचं नुकसा झालं असतं. भारत तंत्रज्ञानाचा वापर करतो. ते खूप प्रगत आहेत. तुम्ही तुमचे ते तंत्रज्ञान आणा, आम्ही तुमच्याकडून खरेदी करण्यास तयार आहोत, असंही ते या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे.
मलिक हे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन अधिकारी आणि कायदेकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावापाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरूद्धच्या तणावात पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या या दाव्याला आता त्यांच्याच नेत्यांनी चुकीचे ठरवले आहे.
'भारताने रावळपिंडीसह अनेक पाकिस्तानी भागांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, हे शाहबाज शरीफ यांनी स्वतः कबूल केले. ते म्हणाले, "भारताने त्यांचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले, ते पाकिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये पडले. रावळपिंडी विमानतळ देखील त्यात आहे."