शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Pakistan Political Crisis: कोण आहेत शाहबाज शरीफ? पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान म्हणून नाव आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:38 IST

आता पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाआधीच इम्रान खान राजीनामा देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकार पाडण्याच्या कटात परदेशी शक्तींचा हात असल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा आहे. पंतप्रधान म्हणून इम्रान खान सरकारला ३ वर्ष १० महिने झाले आहेत. पाकिस्तानात कार्यकाळ पूर्ण होण्याआधी पंतप्रधान पायउतार झाल्याची पहिलीच घटना नाही. आतापर्यंत पाकिस्तानात जितके पंतप्रधान झालेत त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही.

आता पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात शाहबाज शरीफ हे नाव आघाडीवर आहेत. शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील असं बोललं जात आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. शरीफ यांच्या घरी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान बनण्यासाठीच्या जय्यत तयारीही सुरू झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीत शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले होते. मात्र त्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय झाला. त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानी मुस्लीम लीग एनचे नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. ते कुशल प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तानात विरोधी पक्षनेते आहेत. अनेक मुद्द्यांवर शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान सरकारला कोंडीत पकडले होते. ते ३ वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. १९९७ मध्ये पहिल्यांदा ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. १९५१ मध्ये लाहोरमध्ये शाहबाज शरीफ यांचा जन्म झाला.

भारतातून पाकिस्तान स्थलांतरीत झाले कुटुंब

शाहबाज शरीफ यांचे वडील मुहम्मद शरीफ व्यावसायिक होते. त्यांची आई पुलवामा येथे राहणारी आहे. व्यावसायिक कामासाठी ते नेहमी काश्मीरला येऊन जाऊन होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब पंजाबच्या अमृतसर येथे वास्तव्यास होते. ब्रिटीश काळात १९४७ मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. जेव्हा मुहम्मद शरीफ कुटुंबासह लाहोर येथे राहण्यास गेले. नवाज शरीफ, अब्बास शरीफ असे दोघं भाऊ आहेत. शाहबाजने १९७३ मध्ये स्वत:च्या बहिणीशी लग्न केले. त्यांना ४ मुले आहेत. २००३ मध्ये शाहबाज शरीफ यांनी दुसरं लग्न केले.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान