शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Pakistan Political Crisis: कोण आहेत शाहबाज शरीफ? पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान म्हणून नाव आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:38 IST

आता पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षात पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाआधीच इम्रान खान राजीनामा देतील अशी चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलावली होती. सरकार पाडण्याच्या कटात परदेशी शक्तींचा हात असल्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा आहे. पंतप्रधान म्हणून इम्रान खान सरकारला ३ वर्ष १० महिने झाले आहेत. पाकिस्तानात कार्यकाळ पूर्ण होण्याआधी पंतप्रधान पायउतार झाल्याची पहिलीच घटना नाही. आतापर्यंत पाकिस्तानात जितके पंतप्रधान झालेत त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही.

आता पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात शाहबाज शरीफ हे नाव आघाडीवर आहेत. शरीफ हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील असं बोललं जात आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. शरीफ यांच्या घरी हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान बनण्यासाठीच्या जय्यत तयारीही सुरू झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीत शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले होते. मात्र त्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय झाला. त्यामुळे शाहबाज शरीफ यांचे पंतप्रधान बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिले.

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानी मुस्लीम लीग एनचे नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. ते कुशल प्रशासक म्हणूनही ओळखले जातात. सध्या ते पाकिस्तानात विरोधी पक्षनेते आहेत. अनेक मुद्द्यांवर शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान सरकारला कोंडीत पकडले होते. ते ३ वेळा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. १९९७ मध्ये पहिल्यांदा ते पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. १९५१ मध्ये लाहोरमध्ये शाहबाज शरीफ यांचा जन्म झाला.

भारतातून पाकिस्तान स्थलांतरीत झाले कुटुंब

शाहबाज शरीफ यांचे वडील मुहम्मद शरीफ व्यावसायिक होते. त्यांची आई पुलवामा येथे राहणारी आहे. व्यावसायिक कामासाठी ते नेहमी काश्मीरला येऊन जाऊन होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब पंजाबच्या अमृतसर येथे वास्तव्यास होते. ब्रिटीश काळात १९४७ मध्ये जेव्हा भारत-पाकिस्तानची फाळणी झाली. जेव्हा मुहम्मद शरीफ कुटुंबासह लाहोर येथे राहण्यास गेले. नवाज शरीफ, अब्बास शरीफ असे दोघं भाऊ आहेत. शाहबाजने १९७३ मध्ये स्वत:च्या बहिणीशी लग्न केले. त्यांना ४ मुले आहेत. २००३ मध्ये शाहबाज शरीफ यांनी दुसरं लग्न केले.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान