शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Political Crisis: पाकिस्तानात सत्तांतर! शाहबाज शरीफ बनले नवे पंतप्रधान; इम्रान खान सरकार कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:34 IST

संसदेत शाहबाज शरीफ यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली.

कराची – गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा अंतिम निकाल लागला आहे. पीएमएल-एन प्रमुख शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. शरीफ यांनी १७४ मते घेऊन इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली आहे. संसदेत मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षातील सर्व खासदारांनी राजीनामा देत सभागृहाचा त्याग केला. शनिवारी रात्री इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता तेव्हापासून देशातील नव्या पंतप्रधानांबाबत चर्चा सुरू होती.

सोमवारी सभागृह सुरू झाले तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. तर इम्रान खान यांच्या तहरिक ए इंसाफ पार्टीकडून मोहम्मद कुरैशी हे पंतप्रधानपदासाठी उभे राहिले. त्यात शाहबाज शरीफ यांनी बाजी मारत पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे. शाहबाज शरीफ रात्री ८ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे शाहबाज शरीफ यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील.

संसदेत शाहबाज शरीफ यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या सांगण्यावरून शाहबाज शरीफ हे आघाडी पक्षातील खासदारांसोबत सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीवर येऊन बसले. इम्रान खान यांच्या पक्षातील उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. मतदानापूर्वी पीटीआयच्या सर्व खासदारांनी राजीनामा देण्याची घोषणा करत सभागृहात बहिष्कार टाकला.

 

अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडणारे इम्रान खान हे पहिलेच

- ३४२ सदस्यसंख्या असलेल्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती.

- मतदानावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली.

- अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना अपयश आले.

- १८ ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदी आले. त्यांचे सरकार ३ वर्षे ७ महिने २३ चालले. अविश्वास प्रस्तावावर १२ तासहून अधिक वेळ चर्चा झाली.

नव्या सरकारकडे केवळ ५ महिने

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात ३४२ एवढे संख्याबळ आहे. नव्या पंतप्रधानाला १७२ मते मिळविणे आवश्यक आहे. नव्या सरकारच्या हाती केवळ ५ महिनेच राहणार असून ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान