शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Pakistan Political Crisis: पाकिस्तानात सत्तांतर! शाहबाज शरीफ बनले नवे पंतप्रधान; इम्रान खान सरकार कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 18:34 IST

संसदेत शाहबाज शरीफ यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली.

कराची – गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा अंतिम निकाल लागला आहे. पीएमएल-एन प्रमुख शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील. शरीफ यांनी १७४ मते घेऊन इम्रान खान यांच्या पक्षाचे उमेदवार शाह मोहम्मद कुरैशी यांना मात दिली आहे. संसदेत मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्षातील सर्व खासदारांनी राजीनामा देत सभागृहाचा त्याग केला. शनिवारी रात्री इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला होता तेव्हापासून देशातील नव्या पंतप्रधानांबाबत चर्चा सुरू होती.

सोमवारी सभागृह सुरू झाले तेव्हा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शाहबाज शरीफ यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. तर इम्रान खान यांच्या तहरिक ए इंसाफ पार्टीकडून मोहम्मद कुरैशी हे पंतप्रधानपदासाठी उभे राहिले. त्यात शाहबाज शरीफ यांनी बाजी मारत पाकिस्तानचे २३ वे पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला आहे. शाहबाज शरीफ रात्री ८ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे शाहबाज शरीफ यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील.

संसदेत शाहबाज शरीफ यांच्या विजयानंतर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. अध्यक्षांच्या सांगण्यावरून शाहबाज शरीफ हे आघाडी पक्षातील खासदारांसोबत सत्ताधारी पक्षाच्या खुर्चीवर येऊन बसले. इम्रान खान यांच्या पक्षातील उमेदवाराला एकही मत मिळाले नाही. मतदानापूर्वी पीटीआयच्या सर्व खासदारांनी राजीनामा देण्याची घोषणा करत सभागृहात बहिष्कार टाकला.

 

अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडणारे इम्रान खान हे पहिलेच

- ३४२ सदस्यसंख्या असलेल्या कनिष्ठ सभागृहात बहुमतासाठी १७२ मतांची गरज होती.

- मतदानावेळी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली.

- अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना अपयश आले.

- १८ ऑगस्ट २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर इम्रान खान पंतप्रधानपदी आले. त्यांचे सरकार ३ वर्षे ७ महिने २३ चालले. अविश्वास प्रस्तावावर १२ तासहून अधिक वेळ चर्चा झाली.

नव्या सरकारकडे केवळ ५ महिने

पाकिस्तानच्या कनिष्ठ सभागृहात ३४२ एवढे संख्याबळ आहे. नव्या पंतप्रधानाला १७२ मते मिळविणे आवश्यक आहे. नव्या सरकारच्या हाती केवळ ५ महिनेच राहणार असून ऑगस्टमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान