शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

VIDEO : "मोठा भाऊ हा मोठा भाऊच असतो!" भारताची प्रगती पाहून पाकिस्तानी म्हणाले, देश पॉवरफुल...;

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 11:24 IST

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, तांदुळ, पीठांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारी तसेच रशिया-युक्रेन युद्ध याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पण, या संकटातही भारतातील अर्थव्यवस्था डगमगलेली नाही. आयएमएफनेही याचे संकेत दिले आहे. पण, भारता शेजारील देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे, यात श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांची अवस्था बिकट झाली आहे. जगभरात मंदी सावट आहे. पण, भारत प्रगतीत पुढे आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिक भारताचे कौतुक करत आहेत, आणि भारताला आपला मोठा भाऊ मानत आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानी जनतेनेही पाकिस्तानी राज्यकर्त्यांवर टीका केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

किंबहुना भारताची प्रगती आणि पाकिस्तानची गरिबी पाहून पाकिस्तानी नागरीकांनाही पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी लोकांची वाईट अवस्था पाहून पाकिस्तानी जनतेने बडा भाई, बडा भाई होता है असे उघडपणे म्हटले आहे. पाकिस्तान आपल्या अहंकारामुळे भारताकडून मदत घेत नाही. पाकिस्तानची भारताशी स्पर्धा नाही, कारण भारत खूप पुढे गेला आहे, असंही  पाकिस्तानी बोलत आहेत. पाकिस्तानचे भारतासोबतचे संबंध चांगले राहिले असते तर आज पाकिस्तानची अशी अवस्था झाली नसती, असंही पाकिस्तानी जनतेवने म्हटले आहे.

Pakistan vs Bangladesh: आज बांग्लादेश कुठे अन् पाकिस्तान कुठे? 1971 ला भारताने वेगळा केला नसता तर...

सना अमजद नावाच्या यूट्यूब चॅनलवर भारताबाबत पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. यात  त्यांनी भारताचे जोरदार कौतुक केले. आबिद अली नावाच्या पाकिस्तानी नागरिकांने सांगितले की, भारताचे शक्तिशाली देशांशी संबंध आहेत. त्यांची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे. भारतासोबत आमचे संबंध चांगले असते तर भारत आम्हाला कर्ज देईल, ज्या प्रकारे चीन आणि सौदी आम्हाला मदत करतात. पण आपल्या खोट्या अहंकारामुळे वैर आहे. भारत खूप शक्तिशाली आहे, तो आपल्यापेक्षा खूप पुढे आहे, असंही त्याने म्हटले आहे.

'भारत आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. ते लोक कष्ट करत आहेत, आम्ही धर्मातून बाहेर पडू शकलो नाही, भारत आणि पाकिस्तान का वेगळे झाले याचा विचार करत आहोत. तिकडे चिकन दीडशे रुपये किलो आहे, मग आमचा काय दोष सांगा. आपण आपला अहंकार वेगळा केला पाहिजे. मोठा भाऊ मोठा असतो. भारत आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, हे सत्य स्वीकारा. आताही निर्णय घेतला नाही तर कधी घेणार, असंही यात म्हटले आहे.

'सर्व कंपन्यांची प्रॉडक्शन हाऊस भारतात आहेत. जगाला वाटतं की भारतात एवढी मोठी बाजारपेठ आहे, पाकिस्तानात कंपन्या येत नाहीत. कारण सगळेच तोंड उघडून बसलेत की आम्हाला एवढे द्या. बांगलादेश आपल्यापेक्षा पुढे गेला आहे. आमची शर्यत आता अफगाणिस्तान आणि बांगलादेशची आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार नाही, असंही तो नागरिक म्हणाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान