शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आता भारतासोबत 'बासमती तांदळा'साठी भांडणार पाकिस्तान, असा आहे नवा वाद!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 6, 2020 16:15 IST

या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. (Pakistan, )

ठळक मुद्देपाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे.पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य - पाकिस्तानगंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे.

नवी दिल्ली - काश्मीर आणि सीमा वादावरून सातत्याने भारताशी भांडणारा आणि नेहमीच धूळ खाणारा पाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे. आपण युरोपीय यूनियनमध्ये जिओग्राफिकल आयडेंडिफिकेशन (GI) टॅगसाठी भारताच्या दाव्याचा विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे आर्थिक सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ न्यूच्या एका वृत्तानुसार, या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी REAPचे सदस्य म्हणाले, पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य आहे. अब्दुल रजाक यांनी स्पष्टपणे म्हटले आहे, की पाकिस्तान ईयूमध्ये भारताच्या या अर्जाला विरोध करेल. 

इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक यांनी REAP आणि इतरांना, बासमती तांदळावर असलेल्या त्यांच्या दाव्याचे संरक्षण केले जाईल, असा विश्वास दिला आहे.  या वृत्तपत्राने म्हटले आहे, की भारताने ईयूमध्ये बासमती तांदळावर संपूर्ण मालकीचा दावा केला आहे. जियो न्यूजने गल्फ न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे, की यूरोपीयन रेग्युलेशन 2006नुसार, बासमती तांदळाला सध्या भारत आणि पाकिस्तानच्या उत्पादनाच्या रुपात मान्यता आहे.

गंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारताच्या हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांत बासमतीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नुकतीच मध्य प्रदेशनेही जीआय टॅगची मागणी केली होती. मात्र, पंजाबसारख्या राज्यांनी याला विरोध केला होता. भारत दरवर्षी जवळपास 33 हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करतो.

एखाद्या भागातील उत्पादनाला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगमुळे (जीआय टॅग) विशेष ओळख मिळते. चंदेरीची साडी, कांजिवरमची साडी, दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूर ब्लू पोटरी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, मध्य प्रदेशातील झाबुआचे कडकनाथ कोंबडे आणि मलिहाबादी अंब्यांसह आतापर्यंत जवळपास 600हून अधिक भारतीय उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान