शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

आता भारतासोबत 'बासमती तांदळा'साठी भांडणार पाकिस्तान, असा आहे नवा वाद!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 6, 2020 16:15 IST

या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. (Pakistan, )

ठळक मुद्देपाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे.पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य - पाकिस्तानगंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे.

नवी दिल्ली - काश्मीर आणि सीमा वादावरून सातत्याने भारताशी भांडणारा आणि नेहमीच धूळ खाणारा पाकिस्तान आता भारतासोबत बासमती तांदळासाठी भाडणार आहे. आपण युरोपीय यूनियनमध्ये जिओग्राफिकल आयडेंडिफिकेशन (GI) टॅगसाठी भारताच्या दाव्याचा विरोध करणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे आर्थिक सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ न्यूच्या एका वृत्तानुसार, या बैठकीत इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनचे (आयपीओ पाकिस्तान) सचिव, तांदूळ निर्यातदारांच्या संघटनेचे प्रतिनिधी (REAP) आणि कायदे तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी REAPचे सदस्य म्हणाले, पाकिस्तान बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. त्यामुळे भारताचा स्पेशिअॅलिटीचा दावा अयोग्य आहे. अब्दुल रजाक यांनी स्पष्टपणे म्हटले आहे, की पाकिस्तान ईयूमध्ये भारताच्या या अर्जाला विरोध करेल. 

इम्रान खान यांचे सल्लागार अब्दुल रजाक यांनी REAP आणि इतरांना, बासमती तांदळावर असलेल्या त्यांच्या दाव्याचे संरक्षण केले जाईल, असा विश्वास दिला आहे.  या वृत्तपत्राने म्हटले आहे, की भारताने ईयूमध्ये बासमती तांदळावर संपूर्ण मालकीचा दावा केला आहे. जियो न्यूजने गल्फ न्यूजच्या हवाल्याने म्हटले आहे, की यूरोपीयन रेग्युलेशन 2006नुसार, बासमती तांदळाला सध्या भारत आणि पाकिस्तानच्या उत्पादनाच्या रुपात मान्यता आहे.

गंगा नदी आणि हिमालयाच्या मैदानी प्रदेशांत तयार होणाऱ्या बासमती तांदळाचा स्वाद आणि सुगंध जगभरात प्रसिद्ध आहे. भारताच्या हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यांत बासमतीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. नुकतीच मध्य प्रदेशनेही जीआय टॅगची मागणी केली होती. मात्र, पंजाबसारख्या राज्यांनी याला विरोध केला होता. भारत दरवर्षी जवळपास 33 हजार कोटी रुपयांचा तांदूळ निर्यात करतो.

एखाद्या भागातील उत्पादनाला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगमुळे (जीआय टॅग) विशेष ओळख मिळते. चंदेरीची साडी, कांजिवरमची साडी, दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूर ब्लू पोटरी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, मध्य प्रदेशातील झाबुआचे कडकनाथ कोंबडे आणि मलिहाबादी अंब्यांसह आतापर्यंत जवळपास 600हून अधिक भारतीय उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खान