शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती; ख्वाजा आसिफ म्हणाले- 'आम्ही युद्धास...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:15 IST

Pakistan on Delhi Blast: पाकिस्तानला एकीकडे अफगाणिस्तान, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याची भीती सतावत आहे.

Pakistan on Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर पाकिस्तान चिंतेत पडला आहे. भारताने या घटनेला स्पष्टपणे दहशतवादी हल्ला घोषित केल्यामुळे, आपल्यावर भारत हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. अशातच, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताविरुद्ध उघडपणे आक्रमक भूमिका घेतली आहे.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवर युद्ध लढण्यासाठी तयार आहे. त्यांनी असाही दावा केला की, अल्लाहने पहिल्या फेरीत आमची मदत केली आणि दुसऱ्या फेरीतही करेल.

कालपर्यंत सिलिंडर स्फोट म्हणत होते, आता...

दिल्लीस्फोटावर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले , कालपर्यंत भारत याला सिलिंडरचा स्फोट म्हणत होते, पण आता ते याला परदेशी कट म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत कधीही पाकिस्तानवर आरोप करू शकतो. त्यांच्या या वक्तव्याला भारतात “गीदडभभकी” म्हणून पाहिले जात आहे, कारण पाकिस्तान स्वतः दहशतवादाला आश्रय देत असल्याचे पुरावे जगासमोर वारंवार येत राहतात.

पाकिस्तानला दोन्ही बाजूने भीती

पाकिस्तानची पूर्व सीमा भारताशी तर पश्चिम सीमा अफगाणिस्तानशी लागते. या दोन्ही बाजूंनी दबाव वाढल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेने नुकतेच इस्लामाबाद न्यायालय परिसरातील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली, तरीही पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध बोलत आहेत.

टीटीपीचा थेट पाकिस्तानला इशारा

टीटीपीने अलीकडे एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन आपले ठिकाण पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओत टीटीपी सदस्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला “क्रूर” म्हणत थेट आव्हान दिले आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये मुजाहिदीनविरुद्ध लढण्याची ताकद नाही, असा दावा टीटीपीने केला आहे. त्यांनी पुढे पाकिस्तान सरकारच्या पतनाची भविष्यवाणीही केली.

भारताकडून कठोर भूमिका

भारताने दिल्लीतील हल्ल्यानंतर स्पष्ट केले आहे की दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान भेटीदरम्यान जगाला संदेश दिला की, ज्यांनी हा कट रचला आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावीच लागेल. याआधीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताने केलेली कारवाई पाकिस्तानला अजूनही विसरता आलेली नाही. त्यामुळे या वेळीही भारताकडून अशाच प्रकारच्या प्रत्युत्तराची शक्यता असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan fears Indian attack after Delhi blast; vows readiness for war.

Web Summary : Following the Delhi blast, Pakistan fears a potential Indian attack, claiming India might falsely accuse them. Pakistan asserts readiness for war on both eastern and western borders, amid internal TTP threats and external pressure.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBlastस्फोटPakistanपाकिस्तान