शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पाकची सेना भारताबरोबर युद्धाच्या स्थितीत नाही, पाकमधल्या संरक्षणतज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 14:10 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो.

इस्लामाबादः भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक नेहमीच भारताला युद्धाच्या धमक्या देत असतो. पाकिस्तानच्या त्याच धमकीची आता पाकिस्तानमधल्या संरक्षणतज्ज्ञ लेखिका आयशा सिद्दिकी यांनी पोलखोल केली आहे. आमचा देश भारताशी युद्ध करण्याच्या तयारीत नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या गंभीर मंदीचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या चलनातही वारंवार घसरण होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान भारतबरोबर युद्ध करू शकत नाही. तसेच मी माझ्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या एका मित्राला विचारलं की, पाकिस्तान भारताशी युद्ध छेडू शकतो का, तर तो बोलला पाकिस्तानच्या सेनेचा पराभव होईल.पाकिस्तानमधल्या सामान्य व्यक्तीलाही वाटतं की पाकिस्ताननं युद्ध छेडल्यास त्यांचा पराभव अटळ आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी ट्विट करुन काश्मीर प्रश्नावर जगातील देशांनी वेळीच लक्ष दिलं नाही तर जगातील मुस्लिमांना कट्टरता वाढून हिंसाचाराला बळ मिळेल असा दावा केला आहे. कलम 370 हटविल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, हे जग काश्मीरमध्ये मुस्लिमांवर होणारा अन्याय बघत राहणार का? जिहादच्या नावाखाली पाकिस्तानकडून जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जर जगाने काश्मीर प्रश्नी वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील, त्याचे पडसाद जगातील मुस्लिमांवर होऊन कट्टरता वाढेल आणि हिंसाचाराला सुरुवात होईल. भारताने 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 संविधानातून हटविण्याचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करुन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचं जाहीर केले. भारताच्या या ऐतिहासिक निर्णयावर पाकिस्तानकडून विरोध होऊ लागला. त्यामुळे जगभरातील देशांकडून पाठिंबा मिळावा यासाठी पाकच्या पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केले मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जर युद्ध झालं तर त्यासाठी जगातील अन्य देश जबाबदार असतील असं वक्तव्य केलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताकडून मोठी कारवाई होऊ शकते या भीतीने पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे भारताला युद्धाची धमकी देत आहे. भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान