शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 22:53 IST

"भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा."

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधत कठो पावले उचलायला सुरवात केली आहे. यानंतर, पाकिस्तानने याला आव्हान दिले आहे. जर भारताकडे या दहशतवादी हल्ल्याचे काही पुरावे असतील, तर ते त्यांनी सादर करावेत, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ते गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) पत्रकार परिषदेत बोलत होते. डार म्हणाले, "भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा." यावेळी, परराष्ट्र मंत्री डार यांनी एनएससीच्या निर्णयांचा उल्लेख करत, पाकिस्तानने भारताला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, कायदा मंत्री आझम नजीर तरार, माहिती मंत्री अताउल्लाह तरार आणि पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल (एजीपी) मन्सूर अवान हे देखील उपस्थित होते.

कसल्याही आव्हानासाठी पाकिस्तान तयार -डार पुढे म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, भारतीय गुप्तचर संस्था त्यांचे समर्थन करत आहेत आणि परदेशी लोक आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस) निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण कल्पना करू शकता की ते, ते कुठे निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, पाकिस्तानचे सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे. 

यावेळी, संरक्षणमंत्री आसिफ म्हणाले, जरी भारताने या घटनेसाठी थेट पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, मीडिया आणि इतर देश पाकिस्तानला दोषी ठरवत आहेत. जर भारताने अधिकृतपणे पाकिस्तानचे नाव घेतले, तर त्याला त्याचेही उत्तर मिळेल. पाकिस्तानला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. एवढेच नाही तर, "नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत, ज्यांना अमेरिकेने दहशतवादाच्या आधारावर व्हिसा देण्यास नकार दिला होता," असेही आसिफ म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद