शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 22:31 IST

पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. त्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार नाही, पण भारताने आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि दुप्पट गतीने प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी त्यांनी दिली.

डार पुढे म्हणाले, "आमचे सैन्य सतर्क आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारत इस्लामोफोबियाने ग्रस्त आहे, असा आरोप करत, सिंधू जल कराराअंतर्गत भारताला तीन नद्यांचे पाणी देण्यात आले आहे. तीच आपली जीवनरेखा आहे. अशा परिस्थितीत जर भारताने आमचे पाणी रोखले, तर आम्ही ते पाकिस्तानविरुद्धचे युद्ध समजू."

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दाखवले मगरीचे अश्रू  -कालपर्यंत पाकिस्तानच्या संसदेत अणुबॉम्बची धमकी देणारे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील मृत्यूंबद्दल मगरीचे अश्रू दाखवत चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, "निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे निंदनीय आहे, मग हे मृत्यू कुठेही झालेले असले तरी." 

पहलगाम हल्ल्यात झालेल्या जीवितहाणीबद्दल पाकिस्तानने कोणताही शोक व्यक्त केला नाही, या आरोपांचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, "दहशतवादाचा बळी असल्याने, पाकिस्तान त्या लोकांचे दुःख इतर कोणापेक्षाही चांगले जाणतो." डार म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून पाकिस्तानने पहलगाम घटनेवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटवर इतर सदस्यांशी रचनात्मक चर्चा केली, ज्यात हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध