शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 22:31 IST

पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. त्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार नाही, पण भारताने आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि दुप्पट गतीने प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी त्यांनी दिली.

डार पुढे म्हणाले, "आमचे सैन्य सतर्क आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. भारत इस्लामोफोबियाने ग्रस्त आहे, असा आरोप करत, सिंधू जल कराराअंतर्गत भारताला तीन नद्यांचे पाणी देण्यात आले आहे. तीच आपली जीवनरेखा आहे. अशा परिस्थितीत जर भारताने आमचे पाणी रोखले, तर आम्ही ते पाकिस्तानविरुद्धचे युद्ध समजू."

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दाखवले मगरीचे अश्रू  -कालपर्यंत पाकिस्तानच्या संसदेत अणुबॉम्बची धमकी देणारे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पहलगाम हल्ल्यातील मृत्यूंबद्दल मगरीचे अश्रू दाखवत चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, "निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे निंदनीय आहे, मग हे मृत्यू कुठेही झालेले असले तरी." 

पहलगाम हल्ल्यात झालेल्या जीवितहाणीबद्दल पाकिस्तानने कोणताही शोक व्यक्त केला नाही, या आरोपांचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, "दहशतवादाचा बळी असल्याने, पाकिस्तान त्या लोकांचे दुःख इतर कोणापेक्षाही चांगले जाणतो." डार म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणून पाकिस्तानने पहलगाम घटनेवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटवर इतर सदस्यांशी रचनात्मक चर्चा केली, ज्यात हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला होता.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध