शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पाकिस्तान सरकार पीटीआय नेत्यांवर अत्याचार करतंय, इम्रान खान यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 22:41 IST

सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.

लाहोर : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय)  दोन प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर दबावामुळे पीटीआय नेते आपला पक्ष सोडत आहेत, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान यांनी बुधवारी केला. यासोबतच एक दिवस काळाचे चाके फिरणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आणि सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.

इम्रान खान यांनी बुधवारी संध्याकाळी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात ते म्हणाले, "सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या घरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मी तुमच्या लोकांशी चर्चा राहण्याचा प्रयत्न करत राहीन." 9 मे रोजी इम्रान खानच्या अटकेनंतर देशव्यापी हिंसाचारानंतर पीटीआय नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याचा संदर्भ देत पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान म्हणाले, "ही अशी कारवाई आहे जी पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीही घडली नव्हती. आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे." 

यासोबतच तुम्ही पीटीआयमध्ये असेपर्यंत तुमच्यावर कारवाई केली जाईल असे या नेत्यांना सांगण्यात येत आहे. पीटीआय सोडल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा आरोप इम्रान खान यांनी सरकारवर केला. याचबरोबर, इम्रान खान यांनी पीटीआय नेत्यांवर केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, "गुन्हेगारीने कधी आयडिया मारली जाऊ शकते का? संपूर्ण एजन्सी त्यांना मदत करत आहे, तरीही ते निवडणुकीपासून का पळत आहेत.'' तसेच, त्यांनी दावा केला की,  "राजकीय पक्षांची तेव्हाच संपते, जेव्हा त्यांची व्होट बँक संपते. जनतेने आपला निर्णय घेतला आहे. सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तर ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच विजयी होतील."

"पीटीआय नेत्यांनी अंडरग्राऊंड राहावे"इम्रान खान म्हणाले, "मी माझ्या सर्व लोकांना, कार्यालयातील कर्मचारी, पक्षाचे अधिकारी आणि अडचणीत असलेल्या सर्वांना अंडरग्राऊंड राहण्यास सांगितले आहे. जर यामुळे तुम्हाला मदत मिळत असेल तर, स्वतःला हायलाइट करू नका." याशिवाय, पीटीआय नेत्यांवरील आरोपांचा बचाव करताना इम्रान खान म्हणाले, "शिरीन मजारी या सर्वात देशभक्त पाकिस्तानी आहेत. त्या जीव देतील, पण देशाविरुद्ध काहीही करणार नाहीत. इम्रान रयाझ यांना कोर्टात हजर करण्यावरून त्यांच्यावर इतका अत्याचार केल्याचे कोर्ट वारंवार सांगत आहे, की त्यांना आजतागायत कोर्टात हजर केले गेले नाही." 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान