शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

भारत करु शकतो तर आपण का नाही?, पाकिस्तानी नेता म्हणाला...विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:49 IST

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे. शेजारचा भारत इतका पुढे गेला आणि आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आलो आहोत, अशी भावना पाकिस्तानातील नेते व्यक्त करत आहेत. आता पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, पाकिस्तानला आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, तसंच शिक्षण प्रणाली सुधारण्याची गरज आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी 'रिइमॅजिनिंग पाकिस्तान' या चर्चासत्राला संबोधित करताना आपलं मत मांडलं. "भारत, बांगलादेश आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये जन्मदर पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे ५५ लाख मुले जन्माला येतात आणि पाकिस्तानमधील जन्मदर जगात सर्वाधिक आहे. जर पाकिस्तानचा जन्मदर गेल्या दहा वर्षांत बांगलादेशच्या बरोबरीचा असता तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढले असते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात तळाशी आहे. आफ्रिकन देशांपेक्षाही खाली गेला आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल", असं मिफ्ताह इस्माइल म्हणाले. 

शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं गरजेचंपाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षणावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केलं. ते म्हणाले की, पाकिस्तानातील ५० टक्के मुले शाळेत शिकत नाहीत. पाकिस्तानमध्ये केवळ ४४ टक्के मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात, तर भारतात हे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. जग भारताच्या आयआयटीला उच्च दर्जाचं मानते. आता पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानेही कबूल केले आहे की भारतातील आयआयटी जगातील सर्वोच्च संस्थांमध्ये आहे आणि या संस्थांमधून शिकलेले लोक आज जगातील सर्वोच्च कंपन्यांचे सीईओ आहेत. भारतात सर्व उत्तम विद्यापीठे सुरू होत असताना, पाकिस्तानातील सरासरी तरुण तीन महिन्यांचा डिप्लोमा करत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय पाकिस्तानची प्रगती होऊ शकत नाही, असं मिफ्ताह इस्माईल म्हणाले.

महिला सक्षमीकरण आवश्यकमहिला सक्षमीकरणावरही मिफ्ताह इस्माईल यांनी भर दिला. बांगलादेशच्या निर्यातीत वाढ झाल्याचे श्रेय त्यांनी महिला शिक्षणाला दिले. देशाच्या ५० टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, जर भारत आणि बांगलादेश हे करू शकत असतील तर आपणही चांगल्या नेतृत्वाच्या जोरावर ते करू शकतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान