शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारत करु शकतो तर आपण का नाही?, पाकिस्तानी नेता म्हणाला...विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:49 IST

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे. शेजारचा भारत इतका पुढे गेला आणि आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आलो आहोत, अशी भावना पाकिस्तानातील नेते व्यक्त करत आहेत. आता पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, पाकिस्तानला आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, तसंच शिक्षण प्रणाली सुधारण्याची गरज आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी 'रिइमॅजिनिंग पाकिस्तान' या चर्चासत्राला संबोधित करताना आपलं मत मांडलं. "भारत, बांगलादेश आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये जन्मदर पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे ५५ लाख मुले जन्माला येतात आणि पाकिस्तानमधील जन्मदर जगात सर्वाधिक आहे. जर पाकिस्तानचा जन्मदर गेल्या दहा वर्षांत बांगलादेशच्या बरोबरीचा असता तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढले असते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात तळाशी आहे. आफ्रिकन देशांपेक्षाही खाली गेला आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल", असं मिफ्ताह इस्माइल म्हणाले. 

शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं गरजेचंपाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षणावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केलं. ते म्हणाले की, पाकिस्तानातील ५० टक्के मुले शाळेत शिकत नाहीत. पाकिस्तानमध्ये केवळ ४४ टक्के मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात, तर भारतात हे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. जग भारताच्या आयआयटीला उच्च दर्जाचं मानते. आता पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानेही कबूल केले आहे की भारतातील आयआयटी जगातील सर्वोच्च संस्थांमध्ये आहे आणि या संस्थांमधून शिकलेले लोक आज जगातील सर्वोच्च कंपन्यांचे सीईओ आहेत. भारतात सर्व उत्तम विद्यापीठे सुरू होत असताना, पाकिस्तानातील सरासरी तरुण तीन महिन्यांचा डिप्लोमा करत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय पाकिस्तानची प्रगती होऊ शकत नाही, असं मिफ्ताह इस्माईल म्हणाले.

महिला सक्षमीकरण आवश्यकमहिला सक्षमीकरणावरही मिफ्ताह इस्माईल यांनी भर दिला. बांगलादेशच्या निर्यातीत वाढ झाल्याचे श्रेय त्यांनी महिला शिक्षणाला दिले. देशाच्या ५० टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, जर भारत आणि बांगलादेश हे करू शकत असतील तर आपणही चांगल्या नेतृत्वाच्या जोरावर ते करू शकतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान