शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 10:24 IST

शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहे. यामुळे पाकिस्तान गेल्या तीन दिवसांपासून एलओसीवर फायरिंग करत आहे. शिमला करार निलंबित केला आहे, भारताने पाणी बंद करून युद्ध पुकारले आहे, अशा वल्गना करत आहे. दुसरीकडे भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे ठिकाणे उध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. सैन्याने उघडलेली मोहीम पाहून पाकिस्तानची तंतरली आहे. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी सुरु झाली आहे. 

शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने इमर्जन्सी घोषित केली आहे. सैन्याच्याच नाही तर पीओकेतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बदल्याही रद्द केल्या आहेत. 

झेलम व्हॅलीच्या आरोग्य महासंचालकांनी हे आदेश जारी केले आहेत. या भागातील सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य टीम यांनी कर्मचाऱ्यांना आपल्या ड्युटी पॉईंटवर हजर होण्यास सांगावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी वाहनांच्या खासगी वापरालाही बंदी आणण्यात आली आहे. 

भारतीय सैन्याने ९ दहशतवाद्यांची घरे बॉम्ब लावून उध्वस्त केली आहेत. पहलगाम दहशतवाद्याची बहीण या घटनेनंतर एक भाऊ तुरुंगात, दुसरा मुजाहिद्दीन असल्याचे म्हणत आहे. म्हणजे या कुटुंबाची मानसिकताच भारत विरोधी आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी पूर्णपणे बंद करून टाकले आहे. सध्या उन्हाळा असल्याने काश्मीरमधील लोकांना याचा फायदा होणार आहे, शेतीसाठी पाणी मिळणार आहे. परंतू, फार काळ भारत पाकिस्तानचे पाणी रोखू शकणार नाही. कारण त्या प्रमाणात पाणी साठविण्याची यंत्रणा, क्षमता उभारलेली नाहीय. ही यंत्रणा उभारण्यासाठी २० वर्षे लागतील असे अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPOK - pak occupied kashmirपीओके