शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला हुकूमशहाच वठणीवर आणू शकतो - परवेझ मुशर्रफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:03 IST

हुकूमशहा आणि लष्करी सरकारने नेहमीच देशाचं भलं केलं असून योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. मात्र लोकनियुक्त सरकार सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विनाश झाला असं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत.

ठळक मुद्दे'हुकूमशहा आणि लष्करी सरकारने नेहमीच देशाचं भलं केलं असून योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे'पाकिस्तानमधील नागरिकांची इच्छा होती म्हणूनच 1999 मध्ये लष्कराकडून उठाव करण्यात आल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला'संविधान वाचवण्याच्या नावाखाली आपण देशाची विल्हेवाट लावू शकत नाही. देशासाठी संविधानाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल'

इस्लामाबाद, दि. 3 - हुकूमशहा आणि लष्करी सरकारने नेहमीच देशाचं भलं केलं असून योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे. मात्र लोकनियुक्त सरकार सरकार सत्तेत आल्यानंतर सर्व गोष्टींचा विनाश झाला असं पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत तीन वेळा लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. परवेझ मुशर्रफ यांनी बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं असल्याचं वृत्त डॉन या वृत्तपत्राने दिलं आहे. 

'लष्करी सरकारने नेहमीच देशाला योग्य मार्गावर नेण्याचं काम केलं. मात्र लोकनियुक्त सरकारने रुळावरुन जाणारी गाडी खाली आणली', असं मुशर्रफ बोलले आहेत. 'हुकूमशहांनी देशाला योग्य मार्ग दाखवला. देशात लष्कराची सत्ता असताना नेहमीच विकास झाला', असल्याचा दावा मुशर्रफ यांनी यावेळी केला. 'सोबतच देशातील नागरिकांना जोपर्यंत विकास होत आहे तोपर्यत सत्ता कोणाच्या हातात आहे याचा काहीच फरक पडत नाही', असंही ते बोलले आहेत.  

1999 मध्ये लष्कराकडून करण्यात आलेल्या राजकीय बंडखोरीबद्दलही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुशर्रफ यांनी पाकिस्तानमधील नागरिकांची इच्छा होती म्हणूनच तो उठाव करण्यात आल्याचा दावा केला. 'देशातील नागरिकांना हवा होता म्हणूनच तो उठाव करण्यात आला होता', असं मुशर्रफ बोलले आहेत. मुशर्रफ यांनी 12 ऑक्‍टोबर 1999 रोजी नवाझ शरीफ यांच्या सरकारविरोधात लष्करी उठाव करत सत्तेची सूत्रं हाती घेतली होती. 

'पाकिस्तान जेव्हा संकटात होता तेव्हा देशातील नागरिकांनी लष्कराकडे धाव घेत मदत करण्याची मागणी केली होती. जेव्हा कधी पाकिस्तानात मार्शल लॉ लागू करण्यात आला, तेव्हा ती काळाची गरज होती', असं मुशर्ऱफ बोलले आहेत.

' पाकिस्तानच नाही तर आशियातील कोणत्याही देशाकडे पाहिलंत, तर ज्या देशांमध्ये हुकूमशाही होती त्यावेळी त्यांनी ख-या अर्थाने प्रगती केली. आशियातील सर्व देशांनी हुकूमशाहीमुळे विकास पाहिला आहे. हुकूमशहा आणि लोकनियुक्त सरकार असलेल्या देशांची तुलना करुन पाहिलंत तर हुकूमशहा असलेल्या देशांनी समृद्धीकडे वाटचाल केल्याचं लक्षात येईल', असं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. 

'संविधान वाचवण्याच्या नावाखाली आपण देशाची विल्हेवाट लावू शकत नाही. देशासाठी संविधानाकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल', असं मत परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी मात्र परवेझ मुशर्रफ यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आहे.