शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

Pakistan Army On India : पाककडून पुन्हा भारताला युद्धाची धमकी, कारगिलचं उदाहरण देत त्यांच्याच पत्रकारानं केली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:57 IST

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानकडून पु्न्हा एकदा भारताला युद्धाची धमकी देण्यात आली.

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करानं पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भारताविरोधात वक्तव्य केलं. मेजर शरीफ यांनी धमकी दिली की, जर भारतानं काही गैरप्रकार केला तर पाकिस्तानी लष्कर भारताच्या हद्दीत युद्ध करेल आणि त्याला प्रत्युत्तर देईल. परंतु यानंतर पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी स्वत: पाकिस्तानी लष्कराच्या या वक्तव्याला कारगिलचं उदाहरण देऊन चोख प्रत्युत्तर दिलं आणि मेजर शरीफ यांची बोलती बंद केली.“पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाही, पाककडे ना पैसा ना टँकसाठी डिझेल” 

“अखेरच्या वेळी जेव्हा पाकिस्ताननं भारतीय सीमेत युद्ध केलं तेव्हा आपल्या मृत सैनिकांना त्याच ठिकाणी ठेवून पळ ठोकला. इतकंच नाही तर पाकिस्ताननं आपल्या पंतप्रधानांनी सन्मानानं परतावं यासाठी अमेरिकेला रवाना केलं होतं.” असं ट्वीट नायला इनायत यांनी शरीफ यांच्या वक्तव्याला उत्तर देताना केलं. परवेझ मुशर्रफ यांनी सुरू केलेल्या युद्धाकडे त्यांचा निशाणा होता.

कारगिलमध्ये पाक तोंडघशीजेव्हा भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या मृत सैनिकांना त्यांच्याकडे परत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांचे मृतदेह घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर भारतीय लष्करानं या पाकिस्तानी सैनिकांवर पूर्ण सन्मानानं अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याचा पर्दाफाश होताच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान अमेरिकेला पोहोचले. पाकिस्तानी सैन्याला कारगिलमधून माघार घेण्यासाठी कशीतरी मदत करावी, अशी विनंती नवाझ शरीफ यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केली होती.

त्यामुळे पाकिस्तानचे नापाक मनसुबे जगासमोर आले आणि मैत्रीच्या गप्पा मारणाऱ्या आणि भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मुशर्रफ यांचा पर्दाफाश झाला होता. माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असतानाच पाकिस्तानी लष्कराकडून हे वक्तव्य करण्यात आलंय. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी खुलासा केला की, माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी २५ हून अधिक पत्रकारांसमोर कबुली दिली होती की, देशाच्या लष्कराचे टँक काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे डिझेलसाठीही पैसे नाहीत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत