शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'म्हणे, शत्रुत्वाच्या नादात भारताने मूर्खपणा केला!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:45 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला अखेर भारतीय हवाई दलानं घेतला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. हवाई दलाच्या जवळपास 12 मिराज विमानांनी ही मोहीम फत्ते केली. त्यानंतर पाकिस्ताननं हा हल्ला झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं. त्यानंतर आता पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल आसिफ गफूर यांच्या पत्रकार परिषद घेतली आहे. आमचं हवाई दलही सज्ज होतं. परंतु काळोख असल्याकारणानं आमचं हवाई दल कारवाई करू शकलं नाही. पण पुन्हा असा हमला झाल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असंही मेजर आसिफ गफूर म्हणाले आहेत. तसेच भारतानं शत्रुत्वाच्या नादात मूर्खपणा केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.तत्पूर्वी पाकिस्तानी सैन्याचे अधिकृत प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी ट्विटरवरून भारतीय वायुसेनेच्या हल्ल्याची माहिती आज सकाळी दिली. मुझफ्फराबाद सेक्टरमधून भारतीय लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करून हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु कुठल्याही मालमत्तेचे नुकसान अथवा जीवितहानी झालेली नाही. पाकिस्तानी वैमानिकांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर भारतीय विमानांनी पळ काढला, अशा आशयाची पोस्ट आणि फोटो असिफ गफूर यांनी शेअर केले. त्यावर भारतीय ट्विटरवर युजर्स तुटून पडले आहेत. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न पाकिस्तानी नागरिक करत असल्याने असिफ गफुर यांच्या अकाऊंटवरही भारत-पाक ट्विटरवर युद्ध रंगले आहे. मात्र तिथेही भारतीयांचाच विजय होत असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान