शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 23:10 IST

India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे

India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानात सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठीही भारताने जाण्यास नकार दिल्यामुळे, भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. याशिवाय, राजकीय स्तरावर आणि नियंत्रण रेषेवरही फारसे चांगले वातावण नाही. असे असताना आज पाकिस्तानकडून काही भारतीयांना सुखद धक्का देण्यात आला. पाकिस्तानने शुक्रवारी १५४ भारतीयांना एका खास कारणासाठी व्हिसा मंजूर केल्याची माहिती दिली.

व्हिसा मंजूर केल्याचे कारण काय?

 श्री कटास राज मंदिराला ( shree katas raj temple ) भेट देण्यासाठी १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर करण्यात आल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने शुक्रवारी सोशल साइट X वरून ही माहिती दिली. पाकिस्तान उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री कटास राज मंदिरात तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय यात्रेकरूंना व्हिसा देण्याबाबतचे निवेदन चार्ज डी'अफेअर्स साद अहमद वारैच यांनी एक्स वर पोस्ट केले आहे. त्यांनी तीर्थयात्री जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचा प्रवास आध्यात्मिकदृष्ट्या आनंददायी होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, परस्पर समंजसपणा आणि आंतर-धार्मिक सलोखा वाढविण्याच्या धोरणानुसार अशा भेटी सुलभ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे आणि या उद्देशासाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचेही म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १९७४ च्या पाकिस्तान-भारत प्रोटोकॉलनुसार, दरवर्षी भारतातील हजारो हिंदू आणि शीख यात्रेकरू धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेत विविध प्रसंगी आणि धार्मिक उत्सवांना उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला भेट देतात. श्री कटास राज मंदिर किला कटास या नावाने देखील लोकप्रिय आहे. या मंदिराच्या संकुलात अनेक हिंदू मंदिरे देखील आहेत. या मंदिराचे संकुल कटास नावाच्या तलावाने वेढलेले आहे. हिंदू ते पवित्र मानतात. येथे येण्यासाठी व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत.

श्री कटास राज मंदिराचे महत्त्व काय?

श्री कटास राज मंदिर परिसर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार पठार प्रदेशात आहे. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की मंदिराचे तळे महादेवाच्या अश्रूंनी बनलेले आहे. जेव्हा शंकर भगवान त्यांची पत्नी सतीच्या मृत्युनंतर दुःखाने पृथ्वीवर भटकत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंमुळे हा तलाव तयार झाला. हे तलाव दोन कनाल आणि १५ मरळा क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची कमाल खोली २० फूट आहे.

२००५ मध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मंदिरांना भेट दिली होती. २००६ मध्ये, पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि २०१७ मध्ये आणखी सुधारणांची घोषणा केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतVisaव्हिसा