शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर, यामागचं कारणही आहे तितकंच खास, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 23:10 IST

India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे

India Pakistan Relationship: भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानात सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठीही भारताने जाण्यास नकार दिल्यामुळे, भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. याशिवाय, राजकीय स्तरावर आणि नियंत्रण रेषेवरही फारसे चांगले वातावण नाही. असे असताना आज पाकिस्तानकडून काही भारतीयांना सुखद धक्का देण्यात आला. पाकिस्तानने शुक्रवारी १५४ भारतीयांना एका खास कारणासाठी व्हिसा मंजूर केल्याची माहिती दिली.

व्हिसा मंजूर केल्याचे कारण काय?

 श्री कटास राज मंदिराला ( shree katas raj temple ) भेट देण्यासाठी १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर करण्यात आल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने शुक्रवारी सोशल साइट X वरून ही माहिती दिली. पाकिस्तान उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री कटास राज मंदिरात तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय यात्रेकरूंना व्हिसा देण्याबाबतचे निवेदन चार्ज डी'अफेअर्स साद अहमद वारैच यांनी एक्स वर पोस्ट केले आहे. त्यांनी तीर्थयात्री जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचा प्रवास आध्यात्मिकदृष्ट्या आनंददायी होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, परस्पर समंजसपणा आणि आंतर-धार्मिक सलोखा वाढविण्याच्या धोरणानुसार अशा भेटी सुलभ करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे आणि या उद्देशासाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचेही म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १९७४ च्या पाकिस्तान-भारत प्रोटोकॉलनुसार, दरवर्षी भारतातील हजारो हिंदू आणि शीख यात्रेकरू धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेत विविध प्रसंगी आणि धार्मिक उत्सवांना उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला भेट देतात. श्री कटास राज मंदिर किला कटास या नावाने देखील लोकप्रिय आहे. या मंदिराच्या संकुलात अनेक हिंदू मंदिरे देखील आहेत. या मंदिराचे संकुल कटास नावाच्या तलावाने वेढलेले आहे. हिंदू ते पवित्र मानतात. येथे येण्यासाठी व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत.

श्री कटास राज मंदिराचे महत्त्व काय?

श्री कटास राज मंदिर परिसर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार पठार प्रदेशात आहे. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की मंदिराचे तळे महादेवाच्या अश्रूंनी बनलेले आहे. जेव्हा शंकर भगवान त्यांची पत्नी सतीच्या मृत्युनंतर दुःखाने पृथ्वीवर भटकत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंमुळे हा तलाव तयार झाला. हे तलाव दोन कनाल आणि १५ मरळा क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची कमाल खोली २० फूट आहे.

२००५ मध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मंदिरांना भेट दिली होती. २००६ मध्ये, पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि २०१७ मध्ये आणखी सुधारणांची घोषणा केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतVisaव्हिसा