शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप

By संतोष कनमुसे | Updated: October 16, 2025 09:05 IST

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव सुरू आहे. सीमावर्ती भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले आहे. 'अफगाणिस्तान भारतावर "प्रॉक्सी युद्ध" करत आहे', असा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भारत सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.

'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, 'काबूलऐवजी दिल्लीत निर्णय घेतले जात आहेत', असा आरोप आसिफ यांनी केला. त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि भारत यांच्यातील अलिकडच्या बैठकीवरही प्रश्न उपस्थित केले. 'तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा अलिकडचा सहा दिवसांचा भारत दौरा हा एक नियोजित कार्यक्रम होता, असंही आसिफ म्हणाले.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. ७ मे रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीतील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामुळे दोन्ही देशांमधील चार दिवसांचा संघर्ष सुरू झाला, हा पाकिस्तानच्या डीजीएमओ यांच्या विनंतीनंतर थांबवण्यात आला.

४८ तासांचा युद्धविराम

अफगाणिस्तानसोबत ४८ तासांचा युद्धविराम मान्य झाला आहे. दोन्ही देशांमधील सीमा संघर्षांमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.  "तालिबानच्या विनंतीवरून, पाकिस्तान सरकार आणि अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीत पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम स्थापित करण्यात आला आहे, हे आज संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून दोन्ही बाजूंच्या परस्पर संमतीने लागू होईल. अफगाण सरकारचे मुख्य प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, "पाकिस्तानी बाजूच्या विनंती आणि आग्रहावरून, दोन्ही देशांमधील युद्धविराम संध्याकाळी ५:३० नंतर लागू होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Blames India After Taliban Attack, Makes Serious Allegations

Web Summary : Amidst rising tensions, Pakistan accuses India of proxy war via Afghanistan. Pakistan's defense minister alleges decisions are made in Delhi, not Kabul. A 48-hour ceasefire is in place following border clashes. Relations strained after attacks in Kashmir and alleged Indian strikes in Pakistan.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान