शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 15:39 IST

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख

Pakistan India, Nawaz Sharif: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. देशातील जनतेला पक्ष विविध आश्वासने देत आहेत. या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचाही उल्लेख केला आहे. जाहीरनाम्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र यासोबतच त्यांनी भारतासाठी एक अटदेखील ठेवली आहे.

भारतासाठी अट कोणती?

PML-N च्या जाहीरनाम्यात भारतासह इतर देशांसोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. देशांना शांततेचा संदेश देण्याचे वचन दिले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या अटीवर पाकिस्तानकडून भारताशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले जातील. ऑगस्ट २०१९ चा निर्णय मागे घेतला तर पाकिस्तान भारताशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

"जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग"

PML-N कडून जाहीरनाम्यात जरी अशा अटीचे आश्वासन देण्यात आले असले तरी ही अट भारत कधीच पूर्ण करणार नाही. एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा भारताने जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये भारतीय संसदेने कलम ३७० च्या तरतुदी रद्द करणे ही भारताची आणि राज्यघटनेची अंतर्गत बाब असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे ही अट ठेवणे PML-N साठी किती फायद्याचे ठरेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

PML-N च्या जाहीरनाम्यात आणखी काय?

जाहीरनाम्यात पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सुधारणे, हवामान बदलाच्या परिणामांशी लढा देणे, लोकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणे, वीज बिलांत २० ते ३० टक्के कपात करणे, तसेच दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण असे आश्वासनही देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात देशाच्या प्रगतीवर भर देण्यात आला आहे. PML-N ने आपल्या अधिकृत X खात्यावर 'पाकिस्तान को नवाज दो' अशा नावाचा जाहीरनामा शेअर केला आहे.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारत