शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 15:39 IST

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख

Pakistan India, Nawaz Sharif: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. देशातील जनतेला पक्ष विविध आश्वासने देत आहेत. या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचाही उल्लेख केला आहे. जाहीरनाम्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र यासोबतच त्यांनी भारतासाठी एक अटदेखील ठेवली आहे.

भारतासाठी अट कोणती?

PML-N च्या जाहीरनाम्यात भारतासह इतर देशांसोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. देशांना शांततेचा संदेश देण्याचे वचन दिले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या अटीवर पाकिस्तानकडून भारताशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले जातील. ऑगस्ट २०१९ चा निर्णय मागे घेतला तर पाकिस्तान भारताशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

"जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग"

PML-N कडून जाहीरनाम्यात जरी अशा अटीचे आश्वासन देण्यात आले असले तरी ही अट भारत कधीच पूर्ण करणार नाही. एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा भारताने जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये भारतीय संसदेने कलम ३७० च्या तरतुदी रद्द करणे ही भारताची आणि राज्यघटनेची अंतर्गत बाब असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे ही अट ठेवणे PML-N साठी किती फायद्याचे ठरेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

PML-N च्या जाहीरनाम्यात आणखी काय?

जाहीरनाम्यात पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सुधारणे, हवामान बदलाच्या परिणामांशी लढा देणे, लोकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणे, वीज बिलांत २० ते ३० टक्के कपात करणे, तसेच दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण असे आश्वासनही देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात देशाच्या प्रगतीवर भर देण्यात आला आहे. PML-N ने आपल्या अधिकृत X खात्यावर 'पाकिस्तान को नवाज दो' अशा नावाचा जाहीरनामा शेअर केला आहे.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारत