शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 13:04 IST

पाकिस्तानचे स्थायी राजदूत मुनीर अक्रम यांनी नवा भारत धोकादायक आहे म्हणत ते टार्गेट किलिंग करत असल्याचे म्हटलं आहे.

Pakistan Ambassador : लोकसभा निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजप नेत्यांकडून पाकिस्तानातील परिस्थितीची उदाहरणं दिली जात आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभांमध्ये घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांना ठार मारतो, अशी विधाने केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी टार्गेट किलिंगवरून भारतावर निशाणा साधला आहे. नवीन भारत इतरांच्या घरात घुसून तुम्हाला मारत आहे, असे मुनीर अक्रम यांनी म्हटलं. तसेच पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असेही अक्रम म्हणालेत.

पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांवरून अक्रम यांनी भारताला लक्ष्य केले. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना अक्रम यांनी अमेरिकन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला दिला आणि भारतावर निशाणा साधला. कॅनडातील खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडवून आणल्या आहेत, असे अक्रम यांनी म्हटलं.

"पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, सरचिटणीस आणि महासभेच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगच्या घटनांविरोधात भारताच्या मोहिमेची माहिती दिली आहे. मात्र, हे केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. यामध्ये कॅनडातील राजकीय विरोधकांच्या हत्यांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रे आणि शक्यतो इतर देशांमध्येही हा प्रयत्न केला गेला आहे. नवा भारत हा धोकादायक आहे, तो सुरक्षित ठेवत नाही तर असुरक्षित करतो," असे अक्रम यांनी म्हटलं.

दुसरीकडे, अक्रम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. हे लोक इतके घाबरले आहेत की त्यांना स्वप्नातही पाकिस्तानचे अणुबॉम्ब दिसतात. असे सरकार आणि नेते देश चालवू शकतात का?, असे पंतप्रधान मोदी एक सभेत म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना अक्रम यांनी पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असं म्हटलं. 

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना अज्ञातांनी संपवले होते. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने एका वृत्तात दावा केला होता की, भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये हत्या केल्या आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndian Armyभारतीय जवान