शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

पाक पंतप्रधानांनी UNमध्ये आळवला 'काश्मीर' राग, म्हणे काश्मीरमध्ये करा विशेष दूत तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 08:26 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला.

नवी दिल्ली, दि. 22 - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांत (UN) पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला. 

काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की,  पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही. या प्रस्तावात जम्मू काश्मीरमधील लोकांना आत्मनिर्णयाचा अधिकार आहे.  मात्र काश्मिरींना स्वतःसाठी निर्णय घेण्याची अनुमती देण्याऐवजी भारतानं येथे 7 लाख सैनिक तैनात केलेत.

पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर मुद्दा न्याय, शांततापूर्वक आणि जलद गतीनं सोडवला पाहिजे. मात्र भारत पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास तयार नाही. अशा परिस्थिती संयुक्त राष्ट्रांना काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करायला हवा, अशी मागणी करत पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे कांगावा केलाय. अब्बासी यांनी भारतावर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप करत म्हटले की, ''या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत भारतानं जवळपास 600 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मात्र पाकिस्ताननं प्रत्येकवेळी संयम बाळगला आहे. जर भारतानं सीमारेषेवर गोळीबार करणं थांबवलं नाही तर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई करावी लागले''. 

पॅलेट गन वापराचा उल्लेख करत अब्बासी म्हणाले की, भारतीय लष्करानं पॅलेट गनचा वापर करुन हजारो काश्मिरी आणि त्यांच्या मुलांना आंधळं केले आहे. यूएननं काश्मीरमध्ये अत्याचार घडवणा-यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अब्बासी यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान