शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
5
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
6
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
7
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
8
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
9
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
10
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
11
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
12
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
13
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
14
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
15
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
16
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
18
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
19
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाक पंतप्रधानांनी UNमध्ये आळवला 'काश्मीर' राग, म्हणे काश्मीरमध्ये करा विशेष दूत तैनात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 08:26 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला.

नवी दिल्ली, दि. 22 - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांत (UN) पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला. 

काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की,  पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही. या प्रस्तावात जम्मू काश्मीरमधील लोकांना आत्मनिर्णयाचा अधिकार आहे.  मात्र काश्मिरींना स्वतःसाठी निर्णय घेण्याची अनुमती देण्याऐवजी भारतानं येथे 7 लाख सैनिक तैनात केलेत.

पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर मुद्दा न्याय, शांततापूर्वक आणि जलद गतीनं सोडवला पाहिजे. मात्र भारत पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास तयार नाही. अशा परिस्थिती संयुक्त राष्ट्रांना काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करायला हवा, अशी मागणी करत पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे कांगावा केलाय. अब्बासी यांनी भारतावर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप करत म्हटले की, ''या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत भारतानं जवळपास 600 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मात्र पाकिस्ताननं प्रत्येकवेळी संयम बाळगला आहे. जर भारतानं सीमारेषेवर गोळीबार करणं थांबवलं नाही तर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई करावी लागले''. 

पॅलेट गन वापराचा उल्लेख करत अब्बासी म्हणाले की, भारतीय लष्करानं पॅलेट गनचा वापर करुन हजारो काश्मिरी आणि त्यांच्या मुलांना आंधळं केले आहे. यूएननं काश्मीरमध्ये अत्याचार घडवणा-यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अब्बासी यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान