शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

7 हजार भारतीयांनी अमेरिकेकडे मागितला आश्रय- 2017 ची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:35 IST

युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे.

संयुक्त राष्ट्रे- गेल्या वर्षी सुमारे 7 हजार भारतीयांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या अहवालात दिली आहे. अमेरिकेकडे इतर देशांच्या तुलनेत या वर्षी सर्वात जास्त लोकांनी आश्रय मागितल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.2017 वर्ष संपेपर्यंत 68.5 दशलक्ष लोकांना आपले घर सोडावे लागले होते. त्यातील 2017 या एका वर्षात निवासस्थान सोडाव्या लागणाऱ्या लोकांची संख्या 16.2 दशलक्ष इतकी होती.  प्रतिदिन 44 हजार 500 लोकांना विस्थापित व्हावे लागल्यामूळे जगाच्या आजवरच्या इतिहासात या वर्षाला एक विस्थापित वर्ष म्हणूनच ओळखले गेले पाहिजे.

युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, दक्षिण सुदान, म्यानमार येथून लोकांनी विस्थापन केलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. सीरियामधील यादवीला कंटाळून व जीव वाचविण्यासाठी या पाच वर्षांमध्ये लक्षावधी लोकांनी युरोपची वाट धरली होती.अमेरिकेकडे साल्वाडोर देशाच्या 49 हजार 500 लोकांनी आश्रय मागितला. त्यापुर्वीच्या वर्षी 33,600 साल्वाडोर नागरिकांनी आश्रय मागितला होता. व्हेनेझुएलामधील भोंगळ कारभाराला कंटाळून 29,900 लोकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला आहे. मेक्सिकोतील 26,100, चीनमधील 17,400, हैतीच्या 8,600, भारताच्या 7,400 नागरिकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला. जगातील 168 देशांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतामध्ये सध्या 1 लाख 97 हजार 149 विस्थापित असून 10,519 लोकांनी भारताकडे आश्रय मागितला आहे, त्याबाबत निर्णय झालेला नाही.यावर्षभरात म्यानमारमधून 9 लाख 32 हजार लोकांनी बांगलादेशात स्थलांतर केले तर थायलंडमध्ये 1 लाख म्यानमारचे नागरिक राहात आहेत. मलेशियात 98 हजार तर भारतात 18, 100 इतके म्यानमारमधून आलेले विस्थापित आहेत.

टॅग्स :USअमेरिकाIndiaभारत