शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

...म्हणून ओमानच्या राजकुमारी आल्या भारतीयांच्या निशाण्यावर; पाकिस्तानात अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:20 IST

भारतातील मुस्लिमांचा छळ थांबला नाही, तर इथं काम करणार्‍या दहा लाख भारतीयांना परत पाठवण्यात येईल,

मस्कतः ओमानच्या राजकुमारीच्या नावे ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडण्यात आलं असून, सोशल मीडियावरून या बनावट ट्विटर अकाऊंटवरून भारताबद्दल यथेच्छ गरळ ओकली आहे. त्यामुळे ओमानच्या राजकुमारी भारतीयांच्या निशाण्यावर आल्या आहेत. भारतातील मुस्लिमांचा छळ थांबला नाही, तर इथं काम करणार्‍या दहा लाख भारतीयांना परत पाठवण्यात येईल, असं ट्विट त्या बनावट खात्यावरून करण्यात आलं होतं. पाकिस्तानमध्ये हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी हे ट्विट पुन्हा रिट्विट करून भारताला लक्ष्य केले. पण हे ट्विटर अकाऊंट बनावट असल्याचं खातरजमा त्यांनी केलेली नाही. ओमानची राजकन्या मोना बिंट फहद अल सैद यांच्या नावे बनावट ट्विटर खातं उघडण्यात आलं होतं. त्या ट्विटरवर सक्रिय नाहीत. ओमान भारतातील आपल्या मुस्लिम बांधवांसह कायम उभा आहे. जर भारत सरकारने मुस्लिमांचा छळ थांबविला नाही, तर ओमानमध्ये राहणा-या 10 लाख भारतीयांना मायदेशात परत पाठवू. ओमानच्या सुलतानांसमोर मी हा मुद्दा नक्की उपस्थित करेन, असंसुद्धा ट्विटमध्ये म्हटलं आहे. राजकुमारीच्या नावे चालवलेल्या या बनावट ट्विट अकाउंटद्वारे RSSलाही लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून, ओमानची प्रशंसा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी यूएईच्या राजकन्येने संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणा-या भारतीयांना इस्लामोफोबिया पसरू नये, असा इशारा दिला होता. यामुळे ओमानच्या राजकुमारीच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट उघडून करण्यात आलेल्या ट्विटला सत्य समजण्यात आले. पाकिस्तानचे सुप्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी त्या ट्विटर खात्यावरील ट्विट रिट्वीट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांमध्ये काम करणा-या भारतीयांसाठी समस्या निर्माण करीत आहेत. ओमान राजकुमारीच्या ट्विटवरून नरेंद्र मोदींच्या मुस्लिमविरोधी धोरणांविरोधात तीव्र संताप वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेतील हे भारतातील मित्र देश त्यांच्या संबंधांवर पुनर्विचार करतील, असंही पत्रकार हमीद मीर म्हणाले आहेत. हमीद मीर यांच्या या ट्विटला पाकिस्तानी लोकांनी डोक्यावर घेतलं असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं आहे.  पाकिस्तानातल्या एका युजर्सनं लिहिले आहे की, "भारतीय मुसलमानांसोबत आल्याबद्दल धन्यवाद ओमानच्या राजकुमारी." हमीद मीर यांच्या या ट्विटला भारतीयांनी लक्ष्य केलं आहे. भारतातल्या अनेक युजर्सनी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील मुस्लिमांवर होणार्‍या अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना जोरदार ट्विटर युद्ध रंगल्याचं दिसलं. ओमान हा मध्य पूर्वातील सर्वात तटस्थ देश मानला जातो. हे कोणाच्या गोटात नाहीत. परंतु मध्यपूर्वेत रशिया आणि अमेरिकेचे वर्चस्व असल्यानं दोन्ही देशांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांचे इराणशी तसेच सौदी अरेबियाशीही चांगले संबंध आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या