शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
6
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
7
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
8
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
9
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
10
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
11
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
12
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
13
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
14
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
15
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
16
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
17
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
18
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
19
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
20
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 13:31 IST

भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ करत कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पाकिस्तानात असलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, १३ पैकी ११ एअरबेसना लक्ष्य करण्यात आले होते. यासह ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. याच दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर स्थित अण्वस्त्रांना ही हादरा बसल्याचे बोलले जात होते. यावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर काही दावे करण्यात होते की, भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली.

पाकिस्तानची उलट बोंब 

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले की, “आमच्या अण्वस्त्रांची सुरक्षा, कमांड आणि कंट्रोल स्ट्रक्चर अत्यंत सक्षम आणि सुरक्षित आहे. आमच्या अणु धोरणाबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

पण त्याच वेळी, पाकिस्तानने भारताच्या अणु धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी असा आरोप केला की, भारतातील राजकीय वातावरण, प्रसारमाध्यमे आणि काही सामाजिक घटकांमधील वाढता कट्टरतावाद हा अणु सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.

आता चर्चा फक्त पीओकेवर!

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर ठाम भूमिका घेतली. श्रीनगरमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की, पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली आणली गेली पाहिजेत. त्यांनी असेही म्हटले की, भारत आता आण्विक ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही आणि सीमापार दहशतवादाला सडेतोड उत्तर देईल.

भारतीय संसद सदस्य सध्या विविध देशांमध्ये जाऊन जागतिक समुदायाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवत आहेत. पाकिस्तान केवळ दहशतवाद्यांना आश्रय देत नाही, तर त्यांना सक्रिय पाठबळही पुरवत आहे. भारताची भूमिका आता स्पष्ट आहे की,  पाकिस्तानबरोबर कोणतीही चर्चा होणार असल्यास, ती फक्त पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यावरच होईल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर