शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरवरून अणुयुद्धही भडकू शकेल - इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 04:33 IST

काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते.

इस्लामाबाद : काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते. देव न करो, पण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने असे युद्ध परंपरिक युद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचाही भडका उडू शकेल आणि त्याचे परिणाम भारतीय उपखंडाबाहेरही होतील, असे प्रक्षोभक विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.‘अल जजिरा’ या अरबस्तानातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, ही अकल्पनीय शक्यता समोर दिसत असल्यानेच परिस्थिती या थरापर्यंत जाऊ नये यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघांसह प्रत्येत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विनंती करत आहे. त्यांनी हस्तक्षेप करण्याची हिच वेळ आहे.इम्रान खान असेही म्हणाले की, मी शांततावादी व युद्धविरोधी आहे व युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तान कधीही स्वत:हून युद्धाला सुरुवात करणार नाही. पण काश्मीरवरून निर्माण झालेली परिस्थिती अशीच राहिली तर भारताशी युद्ध होण्याची शक्यता आहे, असे मला नक्की वाटते.ते म्हणाले की, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जेव्हा प्राणांतिक युद्धास तोंड फुटते तेव्हा ते युद्ध पारंपरिक यद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता असते. ते पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तानपुरते बोलायचे तर, देव न करो, पण पारंपरिक युद्धात आपला टिकाव लागत नाही, अशी वेळ आली तर अशा (अण्वस्त्रधारी) देशापुढे शरणागती पत्करणे किंवा स्वातंत्र्य जपण्यासाठी प्राणांतिक लढा देणे असे दोनच पर्याय शिल्लक राहतात. असे झाल्यास पाकिस्तानची जनता प्राणपणाने लढणे पसंत करेल, याची मला खात्री आहे.बेकायदेशीरपणे काश्मीर लाटणे आणि त्यावरून तेथे होऊ घातलेला नरसंहार याकडून जगाचे लक्ष हटविण्यासाठी भारत पाकिस्तानवर दहशतवाद पोसण्याचा आरोप करत आहे, असा दावा करत पाकिस्तानचे पंतप्रधान असेही म्हणाले: सहा आठवडे झाले भारताने ८० लाख काश्मिरी नागरिकांना जेरबंद करून ठेवले आहे. या त्यांच्या दुटप्पी खोटेपणातूनच संभाव्य भडक्याची ठिणगी पडू शकेल.इम्रान खान असेही म्हणाले की, काश्मीरची जनता जनमतातून आपले भवितव्य ठरवू शकेल, याची खात्री संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात होती. पण त्याला हरताळ फासून आणि आपल्याच राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० गुंडाळून ठेवून भारताने काश्मीरवर बेकायदा कब्जा केला आहे. त्यामुळे सध्या तरी काश्मीरविषयी भारत सरकारशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही.त्यांनी असाही कांगावा केला की, हा प्रश्न चर्चेतून सुटावा यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करत आला आहे. पण ‘एफएटीएफ’च्या काऴ्या यादीत टाकून निर्बंध आणायचे आणि पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कंगाल करायचे, असे भारत सरकारचे प्रयत्न असल्याचे दिसले तेव्हा आम्ही चर्चेतून माघार घेतली. (वृत्तसंस्था)>सीमेवरील मोर्चा स्थगितपाकव्याप्त काश्मीरमधून प्रत्यक्ष सीमारेषेपर्यंत लाखो लोकांचा एक ‘लॉँग मार्च’ काढून भारताला इशारा देण्याची योजना पाकमधील काही राजकीय व धार्मिक पक्षांनी आखली होती. परंतु २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मी काश्मीरचा मुद्दा मांडणार आहे. तोपर्यंत थांबावे, असे आवाहन इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरमधील सभेत केल्यानंतर हा मार्च तोपर्यंत स्थगित ठेवण्यात आला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान