शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

काश्मीरवरून अणुयुद्धही भडकू शकेल - इम्रान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 04:33 IST

काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते.

इस्लामाबाद : काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची मला नक्की शक्यता वाटते. देव न करो, पण दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने असे युद्ध परंपरिक युद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचाही भडका उडू शकेल आणि त्याचे परिणाम भारतीय उपखंडाबाहेरही होतील, असे प्रक्षोभक विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.‘अल जजिरा’ या अरबस्तानातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले की, ही अकल्पनीय शक्यता समोर दिसत असल्यानेच परिस्थिती या थरापर्यंत जाऊ नये यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघांसह प्रत्येत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर विनंती करत आहे. त्यांनी हस्तक्षेप करण्याची हिच वेळ आहे.इम्रान खान असेही म्हणाले की, मी शांततावादी व युद्धविरोधी आहे व युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पाकिस्तान कधीही स्वत:हून युद्धाला सुरुवात करणार नाही. पण काश्मीरवरून निर्माण झालेली परिस्थिती अशीच राहिली तर भारताशी युद्ध होण्याची शक्यता आहे, असे मला नक्की वाटते.ते म्हणाले की, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये जेव्हा प्राणांतिक युद्धास तोंड फुटते तेव्हा ते युद्ध पारंपरिक यद्धापुरते मर्यादित न राहता त्यातून अणुयुद्धाचा भडका उडण्याचीही शक्यता असते. ते पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तानपुरते बोलायचे तर, देव न करो, पण पारंपरिक युद्धात आपला टिकाव लागत नाही, अशी वेळ आली तर अशा (अण्वस्त्रधारी) देशापुढे शरणागती पत्करणे किंवा स्वातंत्र्य जपण्यासाठी प्राणांतिक लढा देणे असे दोनच पर्याय शिल्लक राहतात. असे झाल्यास पाकिस्तानची जनता प्राणपणाने लढणे पसंत करेल, याची मला खात्री आहे.बेकायदेशीरपणे काश्मीर लाटणे आणि त्यावरून तेथे होऊ घातलेला नरसंहार याकडून जगाचे लक्ष हटविण्यासाठी भारत पाकिस्तानवर दहशतवाद पोसण्याचा आरोप करत आहे, असा दावा करत पाकिस्तानचे पंतप्रधान असेही म्हणाले: सहा आठवडे झाले भारताने ८० लाख काश्मिरी नागरिकांना जेरबंद करून ठेवले आहे. या त्यांच्या दुटप्पी खोटेपणातूनच संभाव्य भडक्याची ठिणगी पडू शकेल.इम्रान खान असेही म्हणाले की, काश्मीरची जनता जनमतातून आपले भवितव्य ठरवू शकेल, याची खात्री संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात होती. पण त्याला हरताळ फासून आणि आपल्याच राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० गुंडाळून ठेवून भारताने काश्मीरवर बेकायदा कब्जा केला आहे. त्यामुळे सध्या तरी काश्मीरविषयी भारत सरकारशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही.त्यांनी असाही कांगावा केला की, हा प्रश्न चर्चेतून सुटावा यासाठी पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करत आला आहे. पण ‘एफएटीएफ’च्या काऴ्या यादीत टाकून निर्बंध आणायचे आणि पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कंगाल करायचे, असे भारत सरकारचे प्रयत्न असल्याचे दिसले तेव्हा आम्ही चर्चेतून माघार घेतली. (वृत्तसंस्था)>सीमेवरील मोर्चा स्थगितपाकव्याप्त काश्मीरमधून प्रत्यक्ष सीमारेषेपर्यंत लाखो लोकांचा एक ‘लॉँग मार्च’ काढून भारताला इशारा देण्याची योजना पाकमधील काही राजकीय व धार्मिक पक्षांनी आखली होती. परंतु २७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत मी काश्मीरचा मुद्दा मांडणार आहे. तोपर्यंत थांबावे, असे आवाहन इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकव्याप्त काश्मीरमधील सभेत केल्यानंतर हा मार्च तोपर्यंत स्थगित ठेवण्यात आला.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान