शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

बांगलादेशवर एनआरसीचा परिणाम नाही, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:10 IST

राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही,

ढाका : राष्ट्रीय नागरिकत्व सूची (एनआरसी) अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असून त्याचा बांगलादेशच्या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्वासन सोमवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बांगलादेशला दिले.गेल्या वर्षी भारतीय संसदेने नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल मोमेन आणि गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी भारताचा डिसेंबरमध्ये होणारा दौरा रद्द केला होता. आसाममध्ये एनआरसी उपलब्ध केल्यानंतर बांगलादेशने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे भारताने एनआरसीचा विषय हा पूर्णपणे आमचा अंतर्गत असल्याचे त्याला कळवले होते.नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक (सीएबी) आणि एनआरसी संमत झाल्यानंतर शेजारच्या देशाला भेट देणारे शृंगला हे पहिलेच अत्यंत वरिष्ठ भारतीय अधिकारी आहेत. सीएएनुसार भारत काही बांगलादेशी स्थलांतरितांना देशात पाठवू शकेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यांतर बांगलादेशने काळजी व्यक्त केली होती. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एनआरसीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केलाहोता. (वृत्तसंस्था)>हा तर भारताचा अंतर्गत विषयएनआरसी अद्ययावत करणे ही प्रक्रिया पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय असल्याचे शृंगला यांनी म्हटले. एनआरसीमुळे बांगलादेशचे लोक आणि बांगलादेशवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे आश्वासन शृंगला यांनी ‘बांगलादेश अँड इंडिया : ए प्रॉमिसिंग फ्युचर’ चर्चासत्रात बोलताना सांगितले. शृंगला ढाकामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी