शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:43 IST

पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल.

पाकिस्तान कर्माने बुडाला आहे. भारत सोडून, सगळ्या देशांकडे मदतीची भीक मागून झालीय. पण कोणी फाटक्या झोळीत पैसे टाकायला मागत नाहीय. पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल. यामुळे भारत देखील पुढे पाऊल टाकत नाहीय. शेजारच्या श्रीलंकेला हवी तेवढी मदत सुरु आहे, पण पाकिस्तानला नाही. 

अशी परिस्थीती असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्‍ट्रीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे डेप्युटी हाय कमिशनर सुरेश कुमार देखील उपस्थित होते. दशकांपासूनचे वितुष्ट विसरून भारत पाकिस्तानची मदत करू शकेल का, यावर चर्चा करण्यात आली. म्हणूनच तिटकारा असला तरी भारताला या बैठकीत बोलविण्यात आले होते. 

२०१९ पासून दोन्ही देशांमधील व्यापार, संपर्क बंद आहे. दोन्ही देश एकाच वेळी जन्माला आले. पण त्या त्या देशाने आपले भविष्य लिहिले. पाकिस्तानने दहशतवादी पोसले, भारताला युद्धात ढकलले. पण भारताने या सर्वांला सामोरे जात विकासाचे व्हिजन ठेऊन सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचे उदाहरण आता पाकिस्तानला तज्ञ लोक देऊ लागले आहेत. आता अमेरिका, चीन नाही तर भारतच पाकिस्तानला मदत करू शकतो, असेही सल्ले मिळू लागले आहे. पाकिस्तानचे सर्व रस्ते बंद झाल्यावर आता त्यांना भारताची आठवण येऊ लागली आहे. 

भारताला पाकिस्तानशी नेहमीच चांगले संबंध हवे आहेत कारण भूगोल बदलता येत नाही, असे कुमार त्या बैठकीत म्हणाले होते. भारत नेहमीच मध्य आशियातील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि पाकिस्तान यामध्ये सहकार्य करू शकतो, असे कुमार म्हणाले आहेत. 

भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हे संबंध बिघडवण्यात लष्करानेही सक्रिय भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. पाकिस्तानात निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावरच भारतासोबतच्या नव्या व्यापार धोरणाचा निर्णय घेतला जाऊ शकणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत