शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...आता दुश्मन भारतच मदत करू शकतो; पाकिस्तानी मीडियाकडूनही मिळतोय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:43 IST

पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल.

पाकिस्तान कर्माने बुडाला आहे. भारत सोडून, सगळ्या देशांकडे मदतीची भीक मागून झालीय. पण कोणी फाटक्या झोळीत पैसे टाकायला मागत नाहीय. पाकिस्तानला पैसे दिले की दहशतवाद्यांना जातात, हा प्रघातच आहे. हे पैसे भारतविरोधी वापरले जातात. मग भारत कशाला पाकिस्तानींची मदत करेल. यामुळे भारत देखील पुढे पाऊल टाकत नाहीय. शेजारच्या श्रीलंकेला हवी तेवढी मदत सुरु आहे, पण पाकिस्तानला नाही. 

अशी परिस्थीती असताना पाकिस्तानच्या लाहोरमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्‍ट्रीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे डेप्युटी हाय कमिशनर सुरेश कुमार देखील उपस्थित होते. दशकांपासूनचे वितुष्ट विसरून भारत पाकिस्तानची मदत करू शकेल का, यावर चर्चा करण्यात आली. म्हणूनच तिटकारा असला तरी भारताला या बैठकीत बोलविण्यात आले होते. 

२०१९ पासून दोन्ही देशांमधील व्यापार, संपर्क बंद आहे. दोन्ही देश एकाच वेळी जन्माला आले. पण त्या त्या देशाने आपले भविष्य लिहिले. पाकिस्तानने दहशतवादी पोसले, भारताला युद्धात ढकलले. पण भारताने या सर्वांला सामोरे जात विकासाचे व्हिजन ठेऊन सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण झाला. याचे उदाहरण आता पाकिस्तानला तज्ञ लोक देऊ लागले आहेत. आता अमेरिका, चीन नाही तर भारतच पाकिस्तानला मदत करू शकतो, असेही सल्ले मिळू लागले आहे. पाकिस्तानचे सर्व रस्ते बंद झाल्यावर आता त्यांना भारताची आठवण येऊ लागली आहे. 

भारताला पाकिस्तानशी नेहमीच चांगले संबंध हवे आहेत कारण भूगोल बदलता येत नाही, असे कुमार त्या बैठकीत म्हणाले होते. भारत नेहमीच मध्य आशियातील बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि पाकिस्तान यामध्ये सहकार्य करू शकतो, असे कुमार म्हणाले आहेत. 

भारतासोबत मजबूत व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. हे संबंध बिघडवण्यात लष्करानेही सक्रिय भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानी मीडियाचे म्हणणे आहे. पाकिस्तानात निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावरच भारतासोबतच्या नव्या व्यापार धोरणाचा निर्णय घेतला जाऊ शकणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत