शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग

By देवेश फडके | Updated: January 11, 2021 12:22 IST

जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामाबाद येथे ते बोलत होते.

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' रागभारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही - इम्रान खानपाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे भारताकडून प्रयत्न; इम्रान खानचा दावा

इस्लामाबाद :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर भाष्य केले आहे. इस्लामाबाद येथे डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी बोलताना इम्रान खान यांनी काश्मीर राग आळवला असून, जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी चर्चा करताना, भारतासोबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाना उत्तर देताना इम्रान खान यांनी भूमिका स्पष्ट केली. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही. भारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी यावेळी केला. 

भारताने शांतता प्रस्थापित करण्याबाबतीत एक पाऊल पुढे टाकायचे सोडून काश्मीरचा भूभाग हडपला आहे. भारताकडून काश्मिरी नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे, असा दावाही इम्रान खान यांनी केला. दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करत असलेले अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. तेव्हापासून वारंवार अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी पाकिस्तानसह अनेकांकडून केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे हा अंतर्गत मुद्दा पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे यापूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान