शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग

By देवेश फडके | Updated: January 11, 2021 12:22 IST

जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामाबाद येथे ते बोलत होते.

ठळक मुद्देपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' रागभारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही - इम्रान खानपाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे भारताकडून प्रयत्न; इम्रान खानचा दावा

इस्लामाबाद :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर भाष्य केले आहे. इस्लामाबाद येथे डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी बोलताना इम्रान खान यांनी काश्मीर राग आळवला असून, जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डिजिटल मीडिया प्रतिनिधींशी चर्चा करताना, भारतासोबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाना उत्तर देताना इम्रान खान यांनी भूमिका स्पष्ट केली. जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही. भारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत, असा आरोप इम्रान खान यांनी यावेळी केला. 

भारताने शांतता प्रस्थापित करण्याबाबतीत एक पाऊल पुढे टाकायचे सोडून काश्मीरचा भूभाग हडपला आहे. भारताकडून काश्मिरी नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे, असा दावाही इम्रान खान यांनी केला. दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करत असलेले अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. तेव्हापासून वारंवार अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी पाकिस्तानसह अनेकांकडून केली जात आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे हा अंतर्गत मुद्दा पाकिस्तानचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे यापूर्वी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान