शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

नेपाळ भूकंपबळींची संख्या ७,७००

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.

काठमांडू : विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.दोन हजार अभियंत्याचा ताफा भूकंपग्रस्त भागातील कोणतीही घरे राहण्यासाठी लायक आहेत, हे तपासण्याकामी लागले असून आतापर्यंत त्यांनी १३ हजार घरांची तपासणी केली आहे. यापैैकी ५० टक्के घरांची अवस्था राहण्यालायक असून २० ते २५ टक्के घरे मात्र राहण्यालायक नाहीत, तर उर्वरित घरांचां जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.२५ एप्रिल रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ७,६५२ वर पोहोचली असून १६,३९० लोक जखमी झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिंधुपाल चौक जिल्ह्याला बसला. या जिल्ह्यात २,९३९ लोक मृत्यूमुखी पडले, तर काठमांडूत १,२०९ लोक मृत्यू पावले.नेपाळचे राष्ट्रपती भवनही राहण्यास योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. ब्रिटीशकालीन या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. शीतल निवास नावाने राष्ट्रपती भवन ओळखले जाते. या इमारतीचा मागचा भाग सुरक्षित नसल्याचे नागरी \विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या तज्ज्ञांंनी घोषित केले आहे.नेपाळने विदेशी मदत पथकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केल्याने भारतासह ३३ देशांचे मदत पथके परतीच्या मार्गावर आहेत. भारताच्या एनडीआरएफचे ८० जणांचे पथक नेपाळहून निघाले आहे. तसेच थायलँडचे २१ स्वयंसेवकही मायदेशी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)----------नेपाळी लष्कर आणि पोलिस भूकंपग्रस्त भागातील मदत कार्य हाती घेणार असून टप्प्याटप्प्यात विदेशी मदत पथके मायदेशी परततील, असे नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, बारापाक डोंगरी भागातील भूकंपग्रस्त लोकांपर्यंत अजुनही मदत पोहोचलेली नाही. तंबू आणि इतर आवश्यक वस्तुंसाठी त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. थंडी आणि पावसापासून बचाव करण्यासाठीही त्यांना सुरक्षित जागा नाही. लष्कराने हेलिकॉप्टरमधून मदत साहित्य पोहोचविले असले तरी ते पुरेसे नाही. मदत साहित्य अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. बारापाक भागातील लोक आता आपापल्या गावाच्या मदतीसाठी परतत आहेत.ड्रोन विमानांना बंदीनेपाळने आपल्या हवाई हद्दीत ड्रोन विमानांना बंदी घातली आहे. मानवरहित विमानांमुळे संवेदनशील माहिती उघड होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.