शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळ भूकंपबळींची संख्या ७,७००

By admin | Updated: May 7, 2015 01:16 IST

विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.

काठमांडू : विनाशकारी भूकंपानंतर उद्धवस्त झालेल्या नेपाळमध्ये आता जनजीवन पुन्हा रूळावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात येत असून या भूकंपातील मृतांचा आकडा ७,७०० वर पोहोचला आहे.दोन हजार अभियंत्याचा ताफा भूकंपग्रस्त भागातील कोणतीही घरे राहण्यासाठी लायक आहेत, हे तपासण्याकामी लागले असून आतापर्यंत त्यांनी १३ हजार घरांची तपासणी केली आहे. यापैैकी ५० टक्के घरांची अवस्था राहण्यालायक असून २० ते २५ टक्के घरे मात्र राहण्यालायक नाहीत, तर उर्वरित घरांचां जीर्णोद्धार करण्याची गरज आहे.२५ एप्रिल रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ७,६५२ वर पोहोचली असून १६,३९० लोक जखमी झाल्याचे गृहमंत्रालयाने सांगितले. या भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिंधुपाल चौक जिल्ह्याला बसला. या जिल्ह्यात २,९३९ लोक मृत्यूमुखी पडले, तर काठमांडूत १,२०९ लोक मृत्यू पावले.नेपाळचे राष्ट्रपती भवनही राहण्यास योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. ब्रिटीशकालीन या इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत. शीतल निवास नावाने राष्ट्रपती भवन ओळखले जाते. या इमारतीचा मागचा भाग सुरक्षित नसल्याचे नागरी \विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या तज्ज्ञांंनी घोषित केले आहे.नेपाळने विदेशी मदत पथकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केल्याने भारतासह ३३ देशांचे मदत पथके परतीच्या मार्गावर आहेत. भारताच्या एनडीआरएफचे ८० जणांचे पथक नेपाळहून निघाले आहे. तसेच थायलँडचे २१ स्वयंसेवकही मायदेशी रवाना झाले आहेत. (वृत्तसंस्था)----------नेपाळी लष्कर आणि पोलिस भूकंपग्रस्त भागातील मदत कार्य हाती घेणार असून टप्प्याटप्प्यात विदेशी मदत पथके मायदेशी परततील, असे नेपाळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, बारापाक डोंगरी भागातील भूकंपग्रस्त लोकांपर्यंत अजुनही मदत पोहोचलेली नाही. तंबू आणि इतर आवश्यक वस्तुंसाठी त्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. थंडी आणि पावसापासून बचाव करण्यासाठीही त्यांना सुरक्षित जागा नाही. लष्कराने हेलिकॉप्टरमधून मदत साहित्य पोहोचविले असले तरी ते पुरेसे नाही. मदत साहित्य अत्यंत कमी प्रमाणात येत आहे. बारापाक भागातील लोक आता आपापल्या गावाच्या मदतीसाठी परतत आहेत.ड्रोन विमानांना बंदीनेपाळने आपल्या हवाई हद्दीत ड्रोन विमानांना बंदी घातली आहे. मानवरहित विमानांमुळे संवेदनशील माहिती उघड होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.