शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:15 IST

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांना चीनच्या अधिक जवळचं मानलं जातं. नेपाळच्या सत्ताधारी दहल सरकारने भारतातील उत्तराखंडमधील लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख परत घेण्याचे आश्वासन दिले आहे. नेपाळला लागून असलेल्या या भागांवर नेपाळ आपला दावा मांडत आहे. नेपाळ सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत जारी केलेल्या दस्तऐवजात हे उघड झाले आहे.

या दस्तऐवजात भारताने कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा भागात अतिक्रमण केले आहे आणि हे क्षेत्र परत घेण्यासाठी नवीन सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे म्हटले आहे. यापूर्वीही नेपाळने या भागांवर दावा केला होता. तसंच भारत आणि नेपाळमधील राजकीय संबंधही ताणले गेले होते. कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत, नेपाळ सरकारचे उद्दिष्ट प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य मजबूत करण्याचे असल्याचे म्हटले आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत भारत हा प्रचंड सरकारच्या निशाण्यावर आहे, मात्र सीमेसंदर्भातील कोणत्याही वादात चीनचा उल्लेख नाही.

दरम्यान कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत नेपाळ सरकारला भारत आणि चीन या दोन्ही देशांशी संतुलिन राजनैतिक संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. तसंच सर्वांशी मैत्री आणि कोणाशीही शत्रूत्व नाही यानुसार नेपाळ सरकार पुढे जाणार असल्याचेही दस्तऐवजात नमूद करण्यात आलेय.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीन