शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नेपाळच्या पंतप्रधानपदी येताच पुष्प कमल दहल यांनी भारताविरोधात केली 'ही' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:15 IST

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे.

नेपाळचे नवे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी भारतविरोधी बाबींना खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांना चीनच्या अधिक जवळचं मानलं जातं. नेपाळच्या सत्ताधारी दहल सरकारने भारतातील उत्तराखंडमधील लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख परत घेण्याचे आश्वासन दिले आहे. नेपाळला लागून असलेल्या या भागांवर नेपाळ आपला दावा मांडत आहे. नेपाळ सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत जारी केलेल्या दस्तऐवजात हे उघड झाले आहे.

या दस्तऐवजात भारताने कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा भागात अतिक्रमण केले आहे आणि हे क्षेत्र परत घेण्यासाठी नवीन सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल असे म्हटले आहे. यापूर्वीही नेपाळने या भागांवर दावा केला होता. तसंच भारत आणि नेपाळमधील राजकीय संबंधही ताणले गेले होते. कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत, नेपाळ सरकारचे उद्दिष्ट प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य मजबूत करण्याचे असल्याचे म्हटले आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या कार्यक्रमांतर्गत भारत हा प्रचंड सरकारच्या निशाण्यावर आहे, मात्र सीमेसंदर्भातील कोणत्याही वादात चीनचा उल्लेख नाही.

दरम्यान कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत नेपाळ सरकारला भारत आणि चीन या दोन्ही देशांशी संतुलिन राजनैतिक संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. तसंच सर्वांशी मैत्री आणि कोणाशीही शत्रूत्व नाही यानुसार नेपाळ सरकार पुढे जाणार असल्याचेही दस्तऐवजात नमूद करण्यात आलेय.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीन