शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नेपाळमध्ये पुन्हा राजकीय संकट, ओलींच्या पार्टीने काढला प्रचंड सरकारचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 22:29 IST

आता प्रचंड सरकारला संसदेत फ्लोर टेस्ट द्यावी लागेल आणि महिनाभरात बहुमत सिद्ध करावे लागेल, असे दिसून येत आहे. 

काठमांडू : नेपाळमधील (Nepal) सध्याचे प्रचंड सरकार अडचणीत आले आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले युती सरकार अडचणीत आले असून, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. आता प्रचंड सरकारला संसदेत फ्लोर टेस्ट द्यावी लागेल आणि महिनाभरात बहुमत सिद्ध करावे लागेल, असे दिसून येत आहे. 

आम्ही सरकारच्या युतीचा पाठिंबा काढून घेतला असून सीपीएनचे (यूएमएल) सर्व मंत्री राजीनामा देणार आहेत. याबाबत सोमवारी बैठक झाली, त्यात पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सीपीएन-यूएमएलचे उपाध्यक्ष बिष्णू पौडेल यांनी सांगितले.  याचबरोबर, सर्व मतभेद असूनही नेपाळमधील राजकीय स्थैर्यासाठी आम्ही सरकार वाचवण्यासाठी आणि टिकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पंतप्रधानांनी युती सरकारच्या मार्गावरून वेगळे जाण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आम्ही पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सीपीएन-यूएमएलचे उपाध्यक्ष बिष्णू पौडेल यांनी सांगितले. 

परराष्ट्रमंत्र्यांचा स्वित्झर्लंडचादौरा थांबवावा आणि त्यांना पदावरून बडतर्फ करावे, असे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्री बिमला राय पौड्याल या यूएमएलच्या आहेत आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या उच्च-स्तरीय सत्रात सहभागी होण्यासाठी त्यांना जिनिव्हाला जायचे होते, परंतु त्यांना दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या जागी नेपाळच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व आता उपपंतप्रधान नारायण काझी करणार आहेत.

नेपाळमध्ये 26 मार्चपर्यंत पुन्हा फ्लोर टेस्टराष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीनेही नेपाळ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. शनिवारी ही घोषणा करण्यात आली होती. आता राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की 26 मार्चपर्यंत पंतप्रधान पुष्प कमल दहल ऊर्फ 'प्रचंड' यांना पुन्हा फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागेल. कलम 100 च्या खंड 2 नुसार, नेपाळच्या राज्यघटनेत तरतूद अशी आहे की, युती तुटल्यास किंवा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास पंतप्रधानांना 30 दिवसांच्या आत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे लागेल. दरम्यान, याआधी 10 जानेवारीला पुष्प कमल दहल यांना फ्लोर टेस्टचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांना 99 टक्के मते मिळाली. नेपाळच्या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पंतप्रधानाला एवढा पाठिंबा मिळाला होता. 

टॅग्स :Nepalनेपाळ