शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मासिक पाळीच्या काळात भेदभाव केल्यास तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:09 IST

बुधवारी संमत झालेल्या ठरावानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांशी भेदभाव करणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावास ठोठावला जाऊ शकतो.

ठळक मुद्देमासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र होतात असा समज या नेपाळी समाजात होता. त्यामुळे महिलांशी हा भेदभाव केला जाई.पहिल्यांदा पाळी आल्यावर मुलीला गोठ्यामध्ये किंवा लहानशा झोपडीमध्ये दहा ते अकरा दिवस एकटीने काढावे लागत.

काठमांडू, दि.10- मासिक पाळीच्या काळात महिलांशी भेदभाव करुन त्यांना घराबाहेर दूर ठेवल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल असा ठरावच नेपाळी संसदेने आज संमत केला. नेपाळमध्ये काही समुदायांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना गावाबाहेर लांब अरुंद दार असलेल्या लहानशा झोपडीत राहण्यास भाग पाडले जाते. याप्रथेला छाऊपडी म्हटले जाते.

याकुप्रथेविरोधात नेपाळच्या संसदेत कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले. बुधवारी संमत झालेल्या ठरावानुसार या प्रथेला खतपाणी देणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावास ठोठावला जाऊ शकतो. साधारणतः वर्षभराच्या अवधीत या ठरावाला कायद्याचे स्वरुप प्राप्त होऊन तो अंमलात येणार आहे.

आज संमत झालेल्या कायद्यामध्ये छाऊपडी प्रथेचा अवलंब करणे तसेच पाळीच्या काळामध्ये मुलींशी कोणताही भेदभाव करणे हे मानवाधिकाराविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चाऊपदीच्या काळामध्ये महिलांना घराबाहेर काढले जाते. त्यांना कोणत्याही अन्नाला, धार्मिक प्रतिके, चिन्हे, देवता, पुरुष, पाळीव जनावरे यांना स्पर्श करण्याची परवानगी नसते. त्याचबरोबर त्यांना एकदम अरुंद दार असलेल्या छाऊगोठ नावाच्या झोपडीत  राहण्यास भाग पाडले जाते.मागील महिन्यामध्ये छाऊगोठमध्ये एका मुलीचा स्पर्शदंशाने मृत्यू झाला होता. 2016 साली देखिल दोन महिलांचा या झोपड्यांमध्ये मृत्यू झाला होता. त्यातील एक महिला झोपडीतील धुरामुळे मरण पावली तर दुसरीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते आजवर अनेक महिलांनी या प्रथेमुळे प्राण गमावलेले आहेत मात्र त्यांची नोंद झालेली नाही. नव्या विधेयकाच्या समितीसाठी काम करणाऱ्या नेपाळी खासदार कृष्णभक्त पोखरेल यांनी ठराव संमत झाल्यावर आनंद व्यक्त केला असून यामुळे चाऊपदी प्रथा नष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

छाऊपडीबद्दलः मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र होतात असा समज या नेपाळी समाजात होता. त्यामुळे महिलांशी हा भेदभाव केला जाई. पहिल्यांदा पाळी आल्यावर मुलीला गोठ्यामध्ये किंवा लहानशा झोपडीमध्ये दहा ते अकरा दिवस एकटीने काढावे लागत. तसेच नंतर प्रत्येक महिन्याला चार ते सात दिवस असे एकटीने राहावे लागत. या काळात पुरुषाला स्पर्श करणे वर्ज्य असते तसेच घराच्या अंगणातसुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच महिलांना दूध, दही, तूप तसेच इतर पौष्टीक पदार्थांना हातही लावू दिला जात नाही. त्यांना फक्त भात, मीठ आणि फळांवरच हे दिवस काढावे लागतात. तसेच तागापासून बनवलेली लहानशी गोधडीच वापरण्याची त्यांना परवानगी असते. या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवले जात नसे तसेच अंघोळ करण्याचीही परवानगी नसते.