शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मासिक पाळीच्या काळात भेदभाव केल्यास तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:09 IST

बुधवारी संमत झालेल्या ठरावानुसार मासिक पाळीच्या काळात महिलांशी भेदभाव करणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावास ठोठावला जाऊ शकतो.

ठळक मुद्देमासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र होतात असा समज या नेपाळी समाजात होता. त्यामुळे महिलांशी हा भेदभाव केला जाई.पहिल्यांदा पाळी आल्यावर मुलीला गोठ्यामध्ये किंवा लहानशा झोपडीमध्ये दहा ते अकरा दिवस एकटीने काढावे लागत.

काठमांडू, दि.10- मासिक पाळीच्या काळात महिलांशी भेदभाव करुन त्यांना घराबाहेर दूर ठेवल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल असा ठरावच नेपाळी संसदेने आज संमत केला. नेपाळमध्ये काही समुदायांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना गावाबाहेर लांब अरुंद दार असलेल्या लहानशा झोपडीत राहण्यास भाग पाडले जाते. याप्रथेला छाऊपडी म्हटले जाते.

याकुप्रथेविरोधात नेपाळच्या संसदेत कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले. बुधवारी संमत झालेल्या ठरावानुसार या प्रथेला खतपाणी देणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावास ठोठावला जाऊ शकतो. साधारणतः वर्षभराच्या अवधीत या ठरावाला कायद्याचे स्वरुप प्राप्त होऊन तो अंमलात येणार आहे.

आज संमत झालेल्या कायद्यामध्ये छाऊपडी प्रथेचा अवलंब करणे तसेच पाळीच्या काळामध्ये मुलींशी कोणताही भेदभाव करणे हे मानवाधिकाराविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चाऊपदीच्या काळामध्ये महिलांना घराबाहेर काढले जाते. त्यांना कोणत्याही अन्नाला, धार्मिक प्रतिके, चिन्हे, देवता, पुरुष, पाळीव जनावरे यांना स्पर्श करण्याची परवानगी नसते. त्याचबरोबर त्यांना एकदम अरुंद दार असलेल्या छाऊगोठ नावाच्या झोपडीत  राहण्यास भाग पाडले जाते.मागील महिन्यामध्ये छाऊगोठमध्ये एका मुलीचा स्पर्शदंशाने मृत्यू झाला होता. 2016 साली देखिल दोन महिलांचा या झोपड्यांमध्ये मृत्यू झाला होता. त्यातील एक महिला झोपडीतील धुरामुळे मरण पावली तर दुसरीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते आजवर अनेक महिलांनी या प्रथेमुळे प्राण गमावलेले आहेत मात्र त्यांची नोंद झालेली नाही. नव्या विधेयकाच्या समितीसाठी काम करणाऱ्या नेपाळी खासदार कृष्णभक्त पोखरेल यांनी ठराव संमत झाल्यावर आनंद व्यक्त केला असून यामुळे चाऊपदी प्रथा नष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

छाऊपडीबद्दलः मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र होतात असा समज या नेपाळी समाजात होता. त्यामुळे महिलांशी हा भेदभाव केला जाई. पहिल्यांदा पाळी आल्यावर मुलीला गोठ्यामध्ये किंवा लहानशा झोपडीमध्ये दहा ते अकरा दिवस एकटीने काढावे लागत. तसेच नंतर प्रत्येक महिन्याला चार ते सात दिवस असे एकटीने राहावे लागत. या काळात पुरुषाला स्पर्श करणे वर्ज्य असते तसेच घराच्या अंगणातसुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच महिलांना दूध, दही, तूप तसेच इतर पौष्टीक पदार्थांना हातही लावू दिला जात नाही. त्यांना फक्त भात, मीठ आणि फळांवरच हे दिवस काढावे लागतात. तसेच तागापासून बनवलेली लहानशी गोधडीच वापरण्याची त्यांना परवानगी असते. या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवले जात नसे तसेच अंघोळ करण्याचीही परवानगी नसते.