शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 07:18 IST

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळच हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात 5 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाहोर : पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या येथील बंगल्याजवळील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर किशोरवयीन तालिबान्याने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा पोलिसांसह नऊ जण ठार झाले. मृतांत दोन पोलीस निरीक्षक व तीन कॉन्स्टेबल्स आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाला. त्यात २५ जण जखमी झाले असून, त्यात १४ पोलिस कर्मचारी आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.शरीफ कुटुंबियाच्या मालकीच्या भव्य निवासस्थानाच्या जवळच पोलीस तपासणी नाका आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरवयीन आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. किमान १४ पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. या मुलाचे नेमके वय समजलेले नाही. या हल्ल्याचे लक्ष्य पोलीस कर्मचारी होते. हल्लेखोर मुलाच्या मृत शरीराचे भाग ताब्यात घेण्यात आले आहेत. हा स्फोट खूपच शक्तिशाली होता व त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानाच्या जवळ तबलिघी जमातने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तबलिघी जमातच्या मेळाव्यात शिरण्याचा चार संशयित अतिरेक्यांनी प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवल्यावर त्यांच्यापैकी एकाने स्वत:ला उडवून घेतले, तर इतर घटनास्थळावरून पळून गेले.हल्ले करीतच राहू : तालिबानची धमकीघटनास्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न एक मुलगा करीत होता. माझ्या सहकाऱ्याने त्याला अडवले व तेवढ्याच शक्तिशाली स्फोट झाला. आवाजाने मी बेशुद्ध पडलो, असे कॉन्स्टेबल हुस्सेन म्हणाले. हा हल्ला आम्ही केल्याचा दावा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने’ केल्याचे काही वृत्तांत म्हटले आहे. असे आणखी हल्ले पोलिसांवर केले जातील अशी धमकीही बंदी असलेल्या या संघटनेने दिली आहे.>भारतात मुत्सद्यांचा छळ होत असल्याची पाकची ओरडइस्लामाबाद : भारतात पाकिस्तानी मुत्सद्यांचा छळ होत असल्याची तक्रार करीत, पाकिस्तानने आपल्या दिल्लीतील राजदूताला मायदेशी बोलावले आहे. भारतातील पाकचे राजदूत सोहेल महमूद यांना अनिश्चित काळासाठी बोलावले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या मुत्सद्यांचा छळ होत असल्याचा वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल म्हणाले की, पाकिस्तानी मुत्सद्दी, त्यांचे कुटुंबीय व कर्मचा-यांना भारताच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या धमक्यांची नोंद घेण्यात भारत सरकारला अपयश आले आहे. पाकने दिल्लीतील मुत्सद्यांना काम करणे कठीण झाल्याचा दावा केला आहे. त्याआधी भारताच्या पाकमधील मुत्सद्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटना त्रास देत आहे, असा आरोप भारताने केला होता. पाकमधील भारतीय निवासी संकुलावर आयएसआयने छापा घातल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी