शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 07:18 IST

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळच हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात 5 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाहोर : पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या येथील बंगल्याजवळील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर किशोरवयीन तालिबान्याने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा पोलिसांसह नऊ जण ठार झाले. मृतांत दोन पोलीस निरीक्षक व तीन कॉन्स्टेबल्स आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाला. त्यात २५ जण जखमी झाले असून, त्यात १४ पोलिस कर्मचारी आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.शरीफ कुटुंबियाच्या मालकीच्या भव्य निवासस्थानाच्या जवळच पोलीस तपासणी नाका आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरवयीन आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. किमान १४ पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. या मुलाचे नेमके वय समजलेले नाही. या हल्ल्याचे लक्ष्य पोलीस कर्मचारी होते. हल्लेखोर मुलाच्या मृत शरीराचे भाग ताब्यात घेण्यात आले आहेत. हा स्फोट खूपच शक्तिशाली होता व त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानाच्या जवळ तबलिघी जमातने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तबलिघी जमातच्या मेळाव्यात शिरण्याचा चार संशयित अतिरेक्यांनी प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवल्यावर त्यांच्यापैकी एकाने स्वत:ला उडवून घेतले, तर इतर घटनास्थळावरून पळून गेले.हल्ले करीतच राहू : तालिबानची धमकीघटनास्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न एक मुलगा करीत होता. माझ्या सहकाऱ्याने त्याला अडवले व तेवढ्याच शक्तिशाली स्फोट झाला. आवाजाने मी बेशुद्ध पडलो, असे कॉन्स्टेबल हुस्सेन म्हणाले. हा हल्ला आम्ही केल्याचा दावा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने’ केल्याचे काही वृत्तांत म्हटले आहे. असे आणखी हल्ले पोलिसांवर केले जातील अशी धमकीही बंदी असलेल्या या संघटनेने दिली आहे.>भारतात मुत्सद्यांचा छळ होत असल्याची पाकची ओरडइस्लामाबाद : भारतात पाकिस्तानी मुत्सद्यांचा छळ होत असल्याची तक्रार करीत, पाकिस्तानने आपल्या दिल्लीतील राजदूताला मायदेशी बोलावले आहे. भारतातील पाकचे राजदूत सोहेल महमूद यांना अनिश्चित काळासाठी बोलावले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या मुत्सद्यांचा छळ होत असल्याचा वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल म्हणाले की, पाकिस्तानी मुत्सद्दी, त्यांचे कुटुंबीय व कर्मचा-यांना भारताच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या धमक्यांची नोंद घेण्यात भारत सरकारला अपयश आले आहे. पाकने दिल्लीतील मुत्सद्यांना काम करणे कठीण झाल्याचा दावा केला आहे. त्याआधी भारताच्या पाकमधील मुत्सद्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटना त्रास देत आहे, असा आरोप भारताने केला होता. पाकमधील भारतीय निवासी संकुलावर आयएसआयने छापा घातल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी