शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार नाहीत! 'ही' आहेत २ महत्त्वाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 15:56 IST

पाकिस्तानात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही

Pakistan New PM Nawaz Sharif Shahabaz Sharif: पाकिस्तानात निवडणुका पार पडल्या असून त्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अशा वेळी इम्रान खान विरूद्ध नवाझ शरीफ असा सामना असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या वर्षी नवाझ शरीफ लंडनहून पाकिस्तानात परतले तेव्हा ते केवळ पंतप्रधान होण्यासाठी परतले होते, असे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर सुरू असलेले खटलेही संपले होते आणि त्याला लष्कराचा पाठिंबाही मिळाला. एवढे सगळे होऊनही त्यांच्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही. बहुमतापासून दूर असूनही नवाझ शरीफ यांचा PML-N सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहे. मात्र ते स्वत: पंतप्रधान होत नाहीत. त्यांनी त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदी पाहायचे आहे, असे शाहबाज यांनी जाहीरपणे सांगितले होते, पण नवाझ यांनी हे पद न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

पहिले कारण-

नवाझ शरीफ पंतप्रधान न होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा पक्ष बहुमतापासून दूर आहे. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनीही आपल्याला बहुमताची अपेक्षा असल्याचे सांगितले. दुसरीकडे, त्यांनी निकालापूर्वीच आघाडी सरकार न चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीच्या दिवशी मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, कठोर निर्णय घेऊन आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी घेऊन बहुमत असलेले सरकारच देशाला सध्याच्या संकटातून बाहेर काढू शकते. अशा परिस्थितीत बहुमत न मिळाल्याने त्यांनी पंतप्रधानपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. PML-Nचे ज्येष्ठ नेते राणा सनाउल्लाह म्हणतात की त्यांच्या पक्षाला नवाझ शरीफ यांना चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून पाहायचे होते, परंतु आम्हाला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ मिळू न शकल्याने त्यांनी माघार घेतली.

दुसरे कारण-

हे सरकार चालवण्यासाठी आम्ही आघाडीचे सूत्रधार शाहबाज शरीफ यांना पुढे केले आहे, असे राणा सनाउल्लाह सांगतात. इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर त्यांनी १६ महिने १३ पक्षांचे युतीचे सरकार यशस्वीपणे चालवले. त्यांचा अनुभव लक्षात घेता शाहबाज शरीफ पंतप्रधान व्हावेत यावर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत झाले. ते म्हणाले की नवाझ शरीफ आणि बाकीच्या पक्षाचा विश्वास आहे की शाहबाज आघाडीचे सरकार अधिक प्रभावीपणे हाताळतील. मात्र, पीएमएलएनने नवाझ शरीफ राजकारण सोडल्याचा अंदाज निराधार असल्याचेही ते म्हणाले. पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे की ते पद घेत नसले तरी पुढील पंतप्रधान आणि पंजाबच्या पुढील मुख्यमंत्र्यांना ते मदत करतील. समर्थकांना पक्षाशी जोडण्याचे कामही तेच करणार आहेत.

टॅग्स :Pakistan Electionsपाकिस्तान निवडणूकPakistanपाकिस्तानNawaz Sharifनवाज शरीफprime ministerपंतप्रधानImran Khanइम्रान खान