शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

बांगलादेशात गेलेल्या रोहिंग्यांच्या परतीच्या वाटेत म्यानमारचे भूसुरुंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 09:34 IST

रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँ

ढाका, दि. ७- बांगलादेशात पळून गेलेल्या व नो मँन्स लँडमध्ये आश्रय घेणा-या रोहिंग्यांना माघारी येता येऊ नये यासाठी म्यानमार सीमेजवळील प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचा आरोप बांगलादेशने केला आहे. राँयटर्सला दिलेल्या माहितीत ढाकास्थित सूत्रांनी माहिती दिली आहे, तर राखिन प्रांताच्या मंत्र्यांनी भूसुरुंग पेरण्यासारखी कृत्ये आम्ही करत नाही असे सांगत हा आरोप फेटाळला आहे. 

बांगलादेश व म्यानमारच्यामध्ये असणा-या तारेच्या कुंपणाला समांतर भूसुरुंग पेरण्याचे काम काही गट करत असल्याचे व त्याचे पुरावे व छायाचित्रे असल्याची माहिती बांगलादेशातील सूत्रांनी दिली आहे. तसेच बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांनी सोमवारी व मंगळवारी म्यानमारच्या दिशेने प्रत्येकी दोन भूसुरुंगाच्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सीमा ओलांडताना झालेल्या स्फोटात एका मुलाने आपला पाय गमावला आहे तर एका मुलास किरकोळ इजा झाल्या आहेत, या मुलांना बांगलादेशात उपचारास आणले गेले असता हा स्फोट भूसुरुंगाचा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. 

एका रोहिंग्याने स्फोटाच्या स्थळी जाऊन केलेल्या चित्रिकरणात दहा सेंमी व्यासाची धातूची चकती दिसून आली, त्यावरुनही म्यानमार सीमावर्ती प्रदेशात भूसुरुंग पेरत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सुरक्षा परिषदेने तात्काळ हस्तक्षेप करावाम्यानमारमध्ये रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली असून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी विनंती ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि नोबेलविजेते महंमद युनुस यांनी केली आहे. अराकान प्रांतातील मानवी संकट आणि मानवतेविरोधात सुरु असलेल्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी तुमच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचे सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या खुल्या पत्रात युनूस यांनी लिहिले आहे. बलात्कार, हत्या,  संपुर्ण खेडी जाळली जाणं यामुळं लोकांना घरदार सोडून परागंदा व्हावं लागत असल्याकडे युनूस यांनी या पत्रात लक्ष वेधले आहे.