शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

 म्यानमारने आपल्या नागरिकांना स्वीकारलेच पाहिजे- सुषमा स्वराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 08:18 IST

गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही.

ढाका- गेले तीन महिने रोहिंग्यांचे स्थलांतर, राखिन प्रांतातील अशांतता यावर कोणताच तोडगा अद्याप निघालेला नाही. भारतात घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवले जाईल, अशी भूमिका घेणा-या भारत सरकारने अद्याप या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. म्यानमारने आपल्या नागरिकांना ( म्हणजे रोहिंग्यांना) पुन्हा माघारी बोलवून त्यांचा स्वीकार केलाच पाहिजे, असे स्पष्ट मत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. बांगलादेशच्या भेटीवर असताना स्वराज यांनी हे मत व्यक्त केल्याचे ढाका ट्रीब्यून या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. 

सुषमा स्वराज दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यावर  आहेत. या दौ-यात त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. या बैठकीत स्वराज यांनी म्यानमारला आपले नागरिक माघारी घ्यावेच लागतील असे मत व्यक्त केल्याचे पंतप्रधान वाजेद यांचे प्रसिद्धी सचिव एहसानुल करिम यांनी सांगितले. या बैठकीतील चर्चेत सुषमा स्वराज म्हणाल्या " म्यानमारने आपले नागरिक माघारी बोलवावेत, .... हे बांगलादेशवर ( स्थलांतरितांचे) ओझे आहे. ते  बांगलादेश कितीकाळ सहन करु शकेल ? यावर कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे." तसेच स्वराज यांनी राखिन प्रांताच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. बांगलादेशाने मानवाधिकारांचा विचार करुन राखिन प्रांतातून परागंदा व्हाव्या लागलेल्या लोकांना आधार व आश्रय दिल्याबद्दल त्यांनी बांगलादेशचे कौतुकही केले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी बांगलादेश याबाबत म्यानमारशी सतत चर्चा करत असल्याचे सांगून बांगला गृहमंत्री लवकरच म्यानमारभेटीवर जाणार असल्याचे सांगितले. सुषमा स्वराज यांनी या बैठकीच्या वेळेस १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामासंदर्भातील काही भेटवस्तू शेख हसिना स्वराज यांना सादर केल्या. यामध्ये पाकिस्तानने पत्करलेल्या शरणागतीची रंगित प्रत, मूळ रेफ्युजी रिलिफ पोस्टल स्टॅम्पची रंगित प्रत तसेच युद्धावेळी बांगलादेशात विमानातून टाकलेल्या पाकिटांची रंगित प्रत भेट म्हणून देण्यात आली. सुषमा स्वराज आणि शेख हसिना वाजेद यांच्याबरोबर या बैठकीत बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री एएच महमूद अली, बांगलादेशच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार डॉ. गौहर रिझवी, बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त सय्यद मुअझ्झिम अली, भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त हर्षवर्धन शृंगला उपस्थित होते. ढाका ट्रीब्यूनच्या माहितीनुसार सुषमा स्वराज यांनी आपल्या वक्तव्यात, राखिन प्रांताच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करुन तेथे लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र संपूर्ण चर्चेमध्ये स्वराज यांनी "रोहिंग्या" शब्द वापरण्याएेवजी म्यानमारचे विस्थापित नागरिक अशाच शब्दांचा वापर केला.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्या