शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

म्यानमारमधील बंडखोरांनी भारतीय सीमेजवळचे शहर घेतले ताब्यात, भारतासाठी चिंता; सर्व लष्करी तळ ताब्यात घेतल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 07:29 IST

पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

यांगून : म्यानमारमधील तीन सशस्त्र गटांपैकी आराकान आर्मी या गटाच्या बंडखोरांनी भारतीय सीमेनजीक असलेले पलेटवा हे शहर ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. या शहरातील सर्व लष्करी तळ आम्ही ताब्यात घेतले आहेत, असेही एएने म्हटले आहे.

म्यानमारमधील चीन राज्यात पलेटवा हे शहर आहे. त्या देशातून भारत व बांगलादेशमध्ये येण्यासाठी जो मार्ग आहे, त्यातील महत्त्वाचे शहर दहशतवाद्यांच्या हाती लागणे ही भारतासाठीदेखील चिंतेची बाब आहे. एएने केलेल्या दाव्यावर म्यानमारच्या लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पलेटवा या शहरात भारताच्या मदतीने अनेक विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे शहरच दहशतवाद्यांच्या ताब्यात गेले असेल, तर तेथील विकासप्रकल्पही धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

म्यानमारमध्ये वांशिक सशस्त्र गट असून, त्यांचा लष्कराशी संघर्ष सुरू आहे. त्यातील एए हा तुलनेने नवा गट असून, तो अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये लष्कराने सत्ता बळकावली. त्यावेळी एए गटाने म्यानमारमधील राखीन या भागावर ६० टक्के नियंत्रण मिळविल्याचा दावा केला होता. 

भारताने ४१६ सैनिकांना पाठविले होते परतसशस्त्र गटांशी सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांत म्यानमारचे चारशेहून अधिक सैनिक पलायन करून भारताच्या हद्दीत आले होते. त्यातील काही सैनिक जखमी होते. त्यांना आसाम रायफल्सने काही दिवस भारतीय हद्दीत आश्रय दिला. त्यातील जखमी सैनिकांवर उपचार केले. आता या म्यानमारच्या सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. मात्र सशस्त्र गटांनी आता भारताच्या सीमेनजिकचे म्यानमारमधील शहर, काही गावे ताब्यात घेण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे म्यानमारबरोबरच भारतालाही चिंता वाटू लागली आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारत