शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 19:06 IST

Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात नेमके किती बंडखोर मारले गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. 

भारत आणि म्यानमार या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या बंडखोरांनी आपले अड्डे उभे केले आहेत. त्या अड्ड्यांनाच म्याानमारकडून आज लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही काळापासून म्यानमारमधील परिस्थिती बिघडत असून, तेथील लष्करी सत्तेला बंडखोर सातत्याने आव्हान देत आहेत. 

दरम्यान, रविवारी रात्रीपासून म्यानमारचं लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये भारताच्या सीमेलगत भीषण गोळीबार सुरू आहे. हा घटनेनंतर म्यानमारमधील शेकडो नागरिक सुरक्षित आसरा शोधण्यासाठी भारताच्या सीमेवर गोळा झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारमधील सैन्य आणि चीनलँड डिफेन्स फोर्स (सीडीएफ) च्या कॅडर्समध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. म्यानमारच्या लष्कराचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. 

चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासून गोळीबार सुरू आहे. तो रात्रभर सुरू होता. आज सकाळी हा गोळीबार थांबला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बॉम्ब टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामुळे भारतात कुठलंही नुकसान झालेलं नाही. संरक्षणविषयक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या दोन आठवड्यांमद्ये उत्तरी शान राज्यामध्ये लढा तीव्र झालेला आहे. 

म्यानमारमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, हिंसेनंतर म्यानमारच्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी भारताच्या सीमेमध्ये आश्रय घेतला आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारपासून म्यानमारचे किती नागरिक भारताच्या हद्दीत आले आहेत, याचा निश्चित आकडा आम्ही सांगू शकत नाही. हे चक्र गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. जेव्हा म्यानमारमध्ये हिंसेचा भडका उडतो तेव्हा तेथील नागरी इकडे आश्रयाचा येतात. त्यातील बहुतांश परत जातील तेव्हा परिस्थिती सामान्य होईल.  

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारत