शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 19:06 IST

Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात नेमके किती बंडखोर मारले गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. 

भारत आणि म्यानमार या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या बंडखोरांनी आपले अड्डे उभे केले आहेत. त्या अड्ड्यांनाच म्याानमारकडून आज लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही काळापासून म्यानमारमधील परिस्थिती बिघडत असून, तेथील लष्करी सत्तेला बंडखोर सातत्याने आव्हान देत आहेत. 

दरम्यान, रविवारी रात्रीपासून म्यानमारचं लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये भारताच्या सीमेलगत भीषण गोळीबार सुरू आहे. हा घटनेनंतर म्यानमारमधील शेकडो नागरिक सुरक्षित आसरा शोधण्यासाठी भारताच्या सीमेवर गोळा झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारमधील सैन्य आणि चीनलँड डिफेन्स फोर्स (सीडीएफ) च्या कॅडर्समध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. म्यानमारच्या लष्कराचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. 

चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासून गोळीबार सुरू आहे. तो रात्रभर सुरू होता. आज सकाळी हा गोळीबार थांबला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बॉम्ब टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामुळे भारतात कुठलंही नुकसान झालेलं नाही. संरक्षणविषयक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या दोन आठवड्यांमद्ये उत्तरी शान राज्यामध्ये लढा तीव्र झालेला आहे. 

म्यानमारमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, हिंसेनंतर म्यानमारच्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी भारताच्या सीमेमध्ये आश्रय घेतला आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारपासून म्यानमारचे किती नागरिक भारताच्या हद्दीत आले आहेत, याचा निश्चित आकडा आम्ही सांगू शकत नाही. हे चक्र गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. जेव्हा म्यानमारमध्ये हिंसेचा भडका उडतो तेव्हा तेथील नागरी इकडे आश्रयाचा येतात. त्यातील बहुतांश परत जातील तेव्हा परिस्थिती सामान्य होईल.  

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारत