शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Myanmar Airstrike: भारताच्या सीमेजवळ म्यानमारकडून एअरस्ट्राइक, मिझोराममध्ये हायअलर्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 19:06 IST

Myanmar Airstrike: भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या बंडखोरांच्या तळांवर म्यानमारकडून एअरस्ट्राइकच्या माध्यमातून हल्ले करण्यात आले आहेत. या एअरस्ट्राइकनंतर भारताकडून मिझोराममध्ये हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. म्यानमारकडून करण्यात आलेल्या या हवाई हल्ल्यात नेमके किती बंडखोर मारले गेले, याची माहिती मिळू शकलेली नाही. 

भारत आणि म्यानमार या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या बंडखोरांनी आपले अड्डे उभे केले आहेत. त्या अड्ड्यांनाच म्याानमारकडून आज लक्ष्य करण्यात आले. गेल्या काही काळापासून म्यानमारमधील परिस्थिती बिघडत असून, तेथील लष्करी सत्तेला बंडखोर सातत्याने आव्हान देत आहेत. 

दरम्यान, रविवारी रात्रीपासून म्यानमारचं लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये भारताच्या सीमेलगत भीषण गोळीबार सुरू आहे. हा घटनेनंतर म्यानमारमधील शेकडो नागरिक सुरक्षित आसरा शोधण्यासाठी भारताच्या सीमेवर गोळा झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्यानमारमधील सैन्य आणि चीनलँड डिफेन्स फोर्स (सीडीएफ) च्या कॅडर्समध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. म्यानमारच्या लष्कराचा सामना करण्यासाठी २०२१ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. 

चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळपासून गोळीबार सुरू आहे. तो रात्रभर सुरू होता. आज सकाळी हा गोळीबार थांबला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ बॉम्ब टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र त्यामुळे भारतात कुठलंही नुकसान झालेलं नाही. संरक्षणविषयक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या दोन आठवड्यांमद्ये उत्तरी शान राज्यामध्ये लढा तीव्र झालेला आहे. 

म्यानमारमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, हिंसेनंतर म्यानमारच्या १ हजारांहून अधिक नागरिकांनी भारताच्या सीमेमध्ये आश्रय घेतला आहे. चम्फाईचे उपायुक्त जेम्स लालरिंचन यांनी सांगितले की, रविवारपासून म्यानमारचे किती नागरिक भारताच्या हद्दीत आले आहेत, याचा निश्चित आकडा आम्ही सांगू शकत नाही. हे चक्र गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. जेव्हा म्यानमारमध्ये हिंसेचा भडका उडतो तेव्हा तेथील नागरी इकडे आश्रयाचा येतात. त्यातील बहुतांश परत जातील तेव्हा परिस्थिती सामान्य होईल.  

टॅग्स :Myanmarम्यानमारIndiaभारत