शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

म्यानमारमध्ये एक हजाराहून अधिक रोहिंग्या मुस्लीम ठार, संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:47 IST

म्यानमारच्या रखाइन राज्यात एक हजाराहून अधिक लोक आधीच ठार झाले असून, त्यातील बहुतांश अल्पसंख्य रोहिंग्या मुस्लीम आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ प्रतिनिधीने गुरुवारी म्हटले आहे.

सेऊल : म्यानमारच्या रखाइन राज्यात एक हजाराहून अधिक लोक आधीच ठार झाले असून, त्यातील बहुतांश अल्पसंख्य रोहिंग्या मुस्लीम आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ प्रतिनिधीने गुरुवारी म्हटले आहे.म्यानमार सरकारने मृतांची संख्या ४७५ असल्याचे म्हटले होते. पण एक हजारांपेक्षा जास्त लोक आधीच ठार झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचे म्यानमारमधील मानवी हक्क विशेष प्रतिनिधी यांघी ली यांनी सांगितले.मृतांत दोन्ही बाजूंचे लोक असतील; परंतु रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्येवर लक्ष केंद्रित झाले होते. गेल्या दोनच आठवड्यांत १६ हजार ४०० रोहिंग्या मुस्लीम लोक बांगलादेशात पळून गेले. तेथील निर्वासितांच्या छावण्या भरून गेल्या आहेत. इतर लोक रखाइन राज्यातील हिंसाचार पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नांत मरण पावले.रोहिंग्या दहशतवाद्यांनी २५ आॅगस्ट रोजी हल्ले केल्यामुळे काही खेडी पूर्णपणे जळून गेली आणि त्यानंतर लष्कराला त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागली. दहशतवादी रोहिंग्यांच्या या कृत्यामुळे सर्वच रोहिंग्या मुस्लीम दहशतवादी आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्या प्रकारामुळे त्यांच्याविषयीची सहानुभूती कमी होत आहे.बौद्ध धर्मीयांची बहुसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना सापत्नभावाची वागणूक मिळते. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लीम अनेक पिढ्यांपासून राहत असले तरी त्यांना नागरिकत्व नाकारले जाते आणि बांगलादेशात त्यांना बेकायदा स्थलांतरित मानले जाते. भारतानेही रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्यास नकार दिला आहे. भारतात ईशान्येकडील अनेक राज्यांत रोहिंग्या मुस्लीम राहत आहेत.आॅगस्टपासून हिंसाचारात वाढ-अधिका-यांनी मृतांची जी आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार २५ आॅगस्टपासूनच्या संघर्षात रोहिंग्यांची ६,६०० घरे आणि मुस्लिमेतरांची २०१ घरे जळून नष्ट झाली आहेत. ३० नागरिक, सात रोहिंग्या, सात हिंदू आणि १६ रखाइन बौद्ध मरण पावले. म्यानमारच्या लष्कराने याआधी ४३० रोहिंग्या दहशतवादी मारले गेल्याचे म्हटले होते.अधिकाºयांनी सांगितले की, या हल्ल्यात आमचे १५ सुरक्षा कर्मचारी मारले गेले. ली यांनी सरकारी अधिकाºयांनी सांगितलेली संख्या खूपच कमी असल्याचे म्हटले. सध्या आम्हाला तेथे प्रवेशच नसल्यामुळे या आकड्यांची खातरजमाच करता येत नाही. ही दुर्दैवी बाब असल्याचे मानवी हक्क विशेष प्रतिनिधी यांघी ली म्हणाले.