शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

बांगलादेशचे मोहम्मद युनूस सरकार पाकिस्तानवर मेहरबान; भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:49 IST

बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत थेट सागरी संपर्क करत आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. आता बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानवर मेहरबान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, समुद्रमार्गे वाढता व्यापार चर्चेत आला आहे. सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश सरकारने पाकिस्तानी मालाला तपासणीतून दिलासा दिला होता आणि आता एक पाकिस्तानी जहाज चितगावला पोहोचले.

'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?

पाकिस्तानमधील कराची येथून हे जहाज बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचले. ११ नोव्हेंबर रोजी त्याच जहाजातून माल बांगलादेशात उतरवण्यात आले, त्या जहाजाला तपासणीतून सूट देण्यात आली. पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी कच्चा माल आणि खाद्यपदार्थ घेऊन जात होते. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत सय्यद अहमद मारूफ यांनी हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंधांमधील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, येणारा काळ दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नवीन संधी उघड करेल.

बांगलादेशला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी थेट सागरी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आवश्यक चाचणीवरही बंदी घातली होती. आता बांगलादेशात पाकिस्तानमधून अशाच प्रकारच्या आयातीवर लादण्यात आलेले निर्बंधही बरेच शिथिल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आशिया खंडावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार देखील चितगावजवळ आहे. याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होईल.

भारत अनेक दिवसांपासून चितगाव बंदरावर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अनेकवेळा भारताने येथे आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. आता पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढणारे सागरी व्यापारी संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनू शकतात.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश