शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशचे मोहम्मद युनूस सरकार पाकिस्तानवर मेहरबान; भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:49 IST

बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत थेट सागरी संपर्क करत आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. आता बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानवर मेहरबान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, समुद्रमार्गे वाढता व्यापार चर्चेत आला आहे. सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश सरकारने पाकिस्तानी मालाला तपासणीतून दिलासा दिला होता आणि आता एक पाकिस्तानी जहाज चितगावला पोहोचले.

'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?

पाकिस्तानमधील कराची येथून हे जहाज बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचले. ११ नोव्हेंबर रोजी त्याच जहाजातून माल बांगलादेशात उतरवण्यात आले, त्या जहाजाला तपासणीतून सूट देण्यात आली. पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी कच्चा माल आणि खाद्यपदार्थ घेऊन जात होते. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत सय्यद अहमद मारूफ यांनी हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंधांमधील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, येणारा काळ दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नवीन संधी उघड करेल.

बांगलादेशला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी थेट सागरी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आवश्यक चाचणीवरही बंदी घातली होती. आता बांगलादेशात पाकिस्तानमधून अशाच प्रकारच्या आयातीवर लादण्यात आलेले निर्बंधही बरेच शिथिल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आशिया खंडावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार देखील चितगावजवळ आहे. याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होईल.

भारत अनेक दिवसांपासून चितगाव बंदरावर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अनेकवेळा भारताने येथे आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. आता पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढणारे सागरी व्यापारी संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनू शकतात.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश