शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशचे मोहम्मद युनूस सरकार पाकिस्तानवर मेहरबान; भारतासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा धोका वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:49 IST

बांगलादेशने पहिल्यांदाच पाकिस्तानसोबत थेट सागरी संपर्क करत आहे.

बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाल्यापासून भारतासोबतचे संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. आता बांगलादेशचे अंतरिम सरकार पाकिस्तानवर मेहरबान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, समुद्रमार्गे वाढता व्यापार चर्चेत आला आहे. सप्टेंबर महिन्यातच बांगलादेश सरकारने पाकिस्तानी मालाला तपासणीतून दिलासा दिला होता आणि आता एक पाकिस्तानी जहाज चितगावला पोहोचले.

'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?

पाकिस्तानमधील कराची येथून हे जहाज बांगलादेशातील चितगाव येथे पोहोचले. ११ नोव्हेंबर रोजी त्याच जहाजातून माल बांगलादेशात उतरवण्यात आले, त्या जहाजाला तपासणीतून सूट देण्यात आली. पाकिस्तानी जहाज बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी कच्चा माल आणि खाद्यपदार्थ घेऊन जात होते. बांगलादेशातील पाकिस्तानचे राजदूत सय्यद अहमद मारूफ यांनी हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंधांमधील महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, येणारा काळ दोन्ही देशांमधील व्यापाराच्या नवीन संधी उघड करेल.

बांगलादेशला १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पाकिस्तानशी थेट सागरी संपर्क साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑक्टोबर महिन्यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आवश्यक चाचणीवरही बंदी घातली होती. आता बांगलादेशात पाकिस्तानमधून अशाच प्रकारच्या आयातीवर लादण्यात आलेले निर्बंधही बरेच शिथिल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेचा आशिया खंडावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्यानमार देखील चितगावजवळ आहे. याचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होईल.

भारत अनेक दिवसांपासून चितगाव बंदरावर होत असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. अनेकवेळा भारताने येथे आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत. आता पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढणारे सागरी व्यापारी संबंध भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनू शकतात.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश