शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"बालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला"; इम्रान खान 

By देवेश फडके | Updated: January 18, 2021 13:28 IST

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे.

ठळक मुद्देअर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या व्हायरल चॅटवरून इम्रान खान यांची टीकाबालाकोटचा वापर मोदी सरकारने निवडणुकांसाठी केला - इम्रान खानपाकिस्तानातील दहशतवाद भारत पुरस्कृत; इम्रान खान यांचा दावा

इस्लामाबाद : अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वादात आता पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी उडी घेतली असून, मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकार भारताचे रुपांतर वाईट देशामध्ये करत आहे, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. 

अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप संभाषण व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचेपंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. या दोघांच्या व्हॉट्सअॅप संवादात बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलही उल्लेख आढळला आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी या प्रकरणी भाष्य केले आहे. 

सन २०१९ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत बोलताना भारतातील फॅसिस्ट नरेंद्र मोदी सरकारने देशातील निवडणुकांसाठी बालाकोटचा वापर केला, असे सांगितले होते. एका भारतीय पत्रकाराच्या संवादातून हा नवीन खुलासा झाला आहे. हा पत्रकार त्याच्या आक्रमकपणामुळे ओळखला जातो. या संवादातून मोदी सरकार आणि भारतीय माध्यमांमध्ये असलेले चुकीच्या संबंधाचाही खुलासा झाला आहे, असे ट्विट इम्रान खान यांनी केले आहे.   

पुढे केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये इम्रान खान म्हणतात की, पाकिस्तानातील दहशतवादामागे भारतच आहे. गेल्या १५ वर्षांपासून भारतव्याप्त जम्मू काश्मीर आणि आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. या चॅटमुळे महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या आहेत. भारतातील माध्यमांचे संबंध उघड झाले आहेत, जे आण्विक क्षेत्राला संघर्षाकडे ढकलत आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला. 

पुन्हा सांगतो की, आमचे सरकार पाकिस्तान आणि मोदी सरकारचे डाव उघडे पाडत राहिले. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला बेजबाबदार आणि लष्करी अजेंड्यापासून थांबवायला हवे. कारण मोदी सरकार संपूर्ण खंडाला एका संघर्षामध्ये ढकलू शकते, असेही इम्रान खान यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी