शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:27 IST

तिबेटमधील भूकंपात आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Earthquake In Tibet:नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील शिजांग या डोंगराळ भागात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

लोक गाढ झोपेत असतानाच भारत, नेपाळ आणि चीन ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमेजवळ होता. या शक्तिशाली भूकंपामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचा प्रभाव चीन आणि भारतातील अनेक शहरांमध्येही दिसून आला. तिबेटमधील भूकंपामुळे दिल्ली, बिहार, बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. सकाळी ९:०५ वाजता शिआन स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसल्याने ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तिबेटमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपानंतर काही सेकंदात किती इमारती मोडकळीस आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत.

नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागांसह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा प्रभाव लक्षणीय होता ज्यामुळे अनेक ठिकाणी इमारती हादरल्या. तिबेटमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यापैकी काही भूकंपाच्या केंद्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर होते. 

तिबेट शेजारील नेपाळमध्ये सक्रिय भूकंपीय क्षेत्र आहे. ज्यामुळे वारंवार आणि कधीकधी आपत्तीजनक भूकंप होत असतात. याआधी २०१५ मधील ७.८ रिश्टर स्केलच्या मोठ्या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास ९,००० लोक मारले गेले आणि २२,००० हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळIndiaभारत