शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

७.१ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस; ५३ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:27 IST

तिबेटमधील भूकंपात आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

Earthquake In Tibet:नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील शिजांग या डोंगराळ भागात मंगळवारी भूकंपाचा धक्का बसला आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असून ६४ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

लोक गाढ झोपेत असतानाच भारत, नेपाळ आणि चीन ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-तिबेट सीमेजवळ होता. या शक्तिशाली भूकंपामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर त्याचा प्रभाव चीन आणि भारतातील अनेक शहरांमध्येही दिसून आला. तिबेटमधील भूकंपामुळे दिल्ली, बिहार, बंगालसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी नोंदवली. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड विध्वंस झाला आहे. सकाळी ९:०५ वाजता शिआन स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहरातील डिंगरी काउंटीला भूकंपाचा धक्का बसल्याने ५३ लोकांचा मृत्यू झाला आणि ६४ हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तिबेटमध्ये सकाळच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपानंतर काही सेकंदात किती इमारती मोडकळीस आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पळताना दिसत आहेत.

नेपाळ, भूतान आणि भारताच्या काही भागांसह शेजारील देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा प्रभाव लक्षणीय होता ज्यामुळे अनेक ठिकाणी इमारती हादरल्या. तिबेटमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळील भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यापैकी काही भूकंपाच्या केंद्रापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर होते. 

तिबेट शेजारील नेपाळमध्ये सक्रिय भूकंपीय क्षेत्र आहे. ज्यामुळे वारंवार आणि कधीकधी आपत्तीजनक भूकंप होत असतात. याआधी २०१५ मधील ७.८ रिश्टर स्केलच्या मोठ्या भूकंपाने नेपाळला उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास ९,००० लोक मारले गेले आणि २२,००० हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपNepalनेपाळIndiaभारत