शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अजहरच्या कुटुंबीयांच्या भारताच्या हल्ल्यात ठिकऱ्या; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर इलियास काश्मिरी याने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:58 IST

यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते.

लाहोर : ७ मे रोजी पाकिस्तानमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये त्या संघटनेचा संस्थापक व दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबाच्या ठिकऱ्या उडाल्या, अशी कबुली या संघटनेचा कमांडर इलियास काश्मिरी याने दिली आहे. यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते.

केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट

हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या "मिशन मुस्तफा" या परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे. बंदूकधाऱ्यांनी वेढलेल्या अवस्थेत उभा असलेला जैश कमांड इलियास काश्मिरी याने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सीमांच्या रक्षणासाठी आम्ही दिल्ली, काबूल आणि कंधारवर हल्ले केले. त्यामुळे भारताने ७ मे रोजी बहावलपूरमध्ये हल्ला करून मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठिकऱ्या उडविल्या. (वृत्तसंस्था)

कोण आहे मसूद अजहर?

१९९९ साली आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणात भारतीय प्रवाशांच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र बनले. मे २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले.

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला.

पहलगाम नरसंहाराला ठोस प्रत्युत्तर देत, भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत जैश-ए-मोहम्मदच्या बालेकिल्ला बहावलपूरसह अनेक दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

त्यावेळी मसूद अजहरच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले होते की, बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह येथे भारताने केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले.

मृतांमध्ये अजहरची मोठी बहीण व तिचा पती व अन्य काहीजण होते. त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्करातील जनरल, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि उच्च पदस्थ नोकरशहा हजर होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान