शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अजहरच्या कुटुंबीयांच्या भारताच्या हल्ल्यात ठिकऱ्या; जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर इलियास काश्मिरी याने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:58 IST

यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते.

लाहोर : ७ मे रोजी पाकिस्तानमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयावर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये त्या संघटनेचा संस्थापक व दहशतवादी मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबाच्या ठिकऱ्या उडाल्या, अशी कबुली या संघटनेचा कमांडर इलियास काश्मिरी याने दिली आहे. यूट्युबवर मंगळवारी प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये तो भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरदरम्यान केलेल्या हल्ल्यांविरोधात विखारी भाषेत वक्तव्य करताना दिसतो. या हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील काही सदस्य मारले गेले होते.

केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट

हा व्हिडीओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ६ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या "मिशन मुस्तफा" या परिषदेतील असल्याचे सांगितले जात आहे. बंदूकधाऱ्यांनी वेढलेल्या अवस्थेत उभा असलेला जैश कमांड इलियास काश्मिरी याने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सीमांच्या रक्षणासाठी आम्ही दिल्ली, काबूल आणि कंधारवर हल्ले केले. त्यामुळे भारताने ७ मे रोजी बहावलपूरमध्ये हल्ला करून मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्यांच्या ठिकऱ्या उडविल्या. (वृत्तसंस्था)

कोण आहे मसूद अजहर?

१९९९ साली आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणात भारतीय प्रवाशांच्या बदल्यात मसूद अजहरची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र बनले. मे २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मसूद अजहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले.

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतांश पर्यटक होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव खूप वाढला.

पहलगाम नरसंहाराला ठोस प्रत्युत्तर देत, भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत जैश-ए-मोहम्मदच्या बालेकिल्ला बहावलपूरसह अनेक दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

त्यावेळी मसूद अजहरच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले होते की, बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाह येथे भारताने केलेल्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले.

मृतांमध्ये अजहरची मोठी बहीण व तिचा पती व अन्य काहीजण होते. त्यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्करातील जनरल, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि उच्च पदस्थ नोकरशहा हजर होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान