शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

रोहिंग्यांना तात्पुरता आसरा देण्यासाठी मलेशियाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:36 IST

म्यानमारमधून गेली दोन ते तीन वर्षे रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया, मलेशियाच्या दिशेने समुद्रमार्गे जात आहेत. अत्यंत लहानशा लाकडी बोटींवर कोंबलेल्या अवस्थेत हे रोहिंग्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पोहोचतात.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी संसदेमध्ये बोलताना भारतातील रोहिंग्यांना परत पाठवण्यात येईल असे जाहीर केले होते.राखिन प्रांतात सुरु असलेला हिंसाचार अयोग्य आहे असे नमूद केलेल्या बाली जाहीरनाम्याला स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे.

क्वालालंपूर, दि.8- म्यानमारमधील वांशिक तणावाला कंटाळून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांना तात्पुरता आसरा देण्याची तयारी मलेशियाने दाखवली आहे. मलेशियाच्या मेरिटाइम एजन्सीच्या प्रमुखांनी याबाबत शुक्रवारी माहिती दिली आहे. म्यानमारमधून गेली दोन ते तीन वर्षे रोहिंग्या थायलंड, इंडोनेशिया, मलेशियाच्या दिशेने समुद्रमार्गे जात आहेत. अत्यंत लहानशा लाकडी बोटींवर कोंबलेल्या अवस्थेत हे रोहिंग्या आग्नेय आशियाई देशांमध्ये पोहोचतात. बऱ्याचवेळा अन्न-पाण्याविना त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यूही ओढवतो. त्यामुळे त्यांना बोट पिपल असे म्हटले जाते.मलेशियाकडे येणाऱ्या बोट पिपलची म्हणजे रोहिंग्यांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. कारण 25 ऑगस्टपासून म्यानमारमध्ये वांशिक तणाव सुरु आहे. या तणावातून जीव वाचवण्यासाठी रोहिंग्या नेफ नदी ओलांडून बांगलादेशच्या दिशेने जात आहेत तर समुद्रमार्गाने आग्नेय आशियात जात आहेत.भारताने मात्र रोहिंग्यांना कोणत्याही स्थितीत परत म्यानमारला पाठवले जाईलच अशी भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी संसदेमध्ये बोलताना भारतातील रोहिंग्यांना परत पाठवण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यावर त्यांनी 'आपण जे संसदेत बोललो ते कायद्याला धरुनच बोललो, यूएनएचसीआरसारख्या कोणत्याही संस्थेला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही' असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. साध्वी प्राची यांनीही रोहिंग्यांच्या विरोधात आपली प्रखर भूमिका स्पष्टपणे व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाकडे मत व्यक्त करताना प्राची म्हणाल्या, 'रोहिंग्या हे इस्लामिक स्टेट पेक्षाही वाईट आहेत. ते अत्यंत कडवे असून त्यांना स्वीकारण्यासाठी कोणताही देश तयार नाही.'त्याचप्रमाणे राखिन प्रांतात सुरु असलेला हिंसाचार अयोग्य आहे असे नमूद केलेल्या बाली जाहीरनाम्याला स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे.