शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भारत-चीन सीमेवर नजर, अमेरिकेची ताकीद; शेजाऱ्यांना घाबरवणं अन् धमकावणं सोडा, अन्यथा...

By प्रविण मरगळे | Updated: February 2, 2021 11:21 IST

भारताच्या हद्दीत घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या चीनच्या प्रयत्नावर पत्रकारांनी होर्न यांना प्रश्न विचारला होता

वॉश्गिंटन – गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा भाष्य केले आहे, अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने सोमवारी निवेदनात म्हटलंय की, चीनकडून शेजारील राष्ट्रांना घाबरवणं आणि धमकावण्याच्या प्रकारावरून अमेरिका चिंतेत आहे. त्याचसोबत भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर अमेरिका लक्ष ठेऊन असल्याची ताकीद अमेरिकेने ड्रॅगनला दिली आहे.

व्हाइट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली जे होर्न म्हणाल्या की, आम्ही सीमेवरील परिस्थितीवर नजर ठेऊन आहोत, भारत आणि चीन यांच्या दोन्ही सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याची आम्हाला माहिती आहे, सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी संवाद गरजेचा आहे, त्याचं आम्ही समर्थन करतो. मात्र शेजाऱ्यांना धमकावणं आणि दहशत पसरवणं यामुळे आम्ही चिंतेत आहोत.

भारताच्या हद्दीत घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या चीनच्या प्रयत्नावर पत्रकारांनी होर्न यांना प्रश्न विचारला होता, त्यावेळी त्या म्हणाल्या की, बीजिंगद्वारे शेजारच्या देशांना भय घालणे आणि धमकावणे यामुळे आम्ही चिंतेत आहोत. हिंद महासागर परिसरात शांतता, समृद्धी आणि सुरक्षा प्रस्थापित ठेवण्यासाठी आम्ही मित्रांच्या, भागीदारांच्या आणि सहकाऱ्यांसोबत उभे राहू असं अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

भारत-चीन सीमेवर सुरु असलेल्या तणावाच्या काळात बायडेन प्रशासनाकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसद अधिवेशनाच्या सुरूवातीला संबोधित करताना म्हटलं होतं की, देशाच्या हितासाठी आणि रक्षणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. सरकार नेहमी सतर्क आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर भारताचं सैन्यबल तैनात असून देशाची एकता आणि अखंडतेला आव्हान देणाऱ्या शक्तीविरोधात लढण्यासाठी तयार आहोत.   

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावJoe Bidenज्यो बायडनIndiaभारतAmericaअमेरिका